मुंबई : सध्या बंडखोर आमदारांनी महाराष्ट्राची लक्तरे सुरत वरून गुवाहाटीला नेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जनता या गोष्टीला विटून गेली आहे. अशा परिस्थितीत स्वत: अंतर्गत भांडणं विसरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंचा देखील उल्लेख केला.
“मान कापली तरी गुवाहाटीला जाणार नाही, मला अटक करा”; ईडीचं समन्सनंतर राऊतांची प्रतिक्रिया
केंद्र सरकारकडून जो केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्यानेच काही आमदारांनी बंडखोरी पत्काराली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने लक्ष्मण आपल्या रामासाठी उभा होता. त्याचमुळे हिंदुत्व शिकवणाऱ्या भावांनी एकत्र येणे गरजेचे आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, मात्र शेवटची ते बाळासाहेब ठाकरेंचं पुतण्या आहेत. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबीयांनी दाखवून दिलं पाहिजे की आम्ही खरे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहोत. असंही रूपाली पाटील म्हणाल्या.
“बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात राऊतांच्या इशारा देणाऱ्या भाषणाच्या लिंक दिल्या”
सध्या महाराष्ट्राला केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक भाजपकडून केला जात आहे. त्यांना जोरदार प्रत्त्युत्तर देणारे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार यांनी एकत्र यायला पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाब असल्याने प्रत्येक व्यक्ती मनाने तुटत चाललेली आहे आणि त्याचा फायदा भाजप घेत आहे. त्यामुळे भाजपला कडव आव्हान देण्याची बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा जन्म घेतला पाहिजे, अंसही त्या म्हणाल्या.
ब्रेकिंग..! बंडखोर 39 शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जहरी टिका केली. ते म्हणाले की पर्यावरण मंत्री म्हणून माझं हेच काम होते. राज्यात कोठेही घाण साचू नये आणि ती घाण गेलेली आहे याचा आनंद आहे. आता यावर रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे तुम्ही घरातल्या सोन्यासारख्या माणसांना गमावणे ह्याला घाण स्वच्छ करणे म्हणत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव येते. विनाशकाले विपरीत बुद्धी असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
Read also:
- “बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा अन् धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय”;
- आता तर विठ्ठलाची महापुजा ‘उद्धव ठाकरेचं’ करणार; SC च्या निकालानंतर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया
- बंडखोर आमदारांना केंद्र अन् राज्याने सुरक्षा द्यावी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- “आम्ही संपणार नाही, थांबणार नाही, माघार घेणार नाही”; बंडखोर आमदारांची भूमिका
- राजकीय हस्तक्षेप झालेल्या मतदार याद्या बदला, अन्यथा..; विधान परिषद आमदार उमा खापरेंचा इशारा