मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातील 39 शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आता अल्पमतात आल्याची माहिती शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी दिली आहे. शिंदे गटातील 15 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
पत्रकारांना चकवा देत ‘एकनाथ शिंदे’ काल गुजरातमध्ये; फडणवीससोबत चर्चा झाल्याची माहिती
शिंदे गटातील १५ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेच दोन गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. एक तर आमदारांनी उपाध्यक्षांना बेकायदेशीय ठरवून आमदारांना अपात्र नोटिशीला आव्हान दिले आहे. दुसरे म्हणजे त्यांनी स्वत: ला आणि आपल्या कुटुंबाला न्यायालयाकडून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकिल हरीश साळवे आज सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. त्यावेळी शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने देवदत्त कामत लढणार आहे. तर उपाध्यक्षांसाठी अधिवक्ता रविशंकर जंध्याला लढणार आहे. आमदारांच्या वतीने दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहे.
देवा लवकर आटप रे हे सगळं..! हॅाटेलचे बिल वाढतेय; दिपाली सय्यदचा खोचक टोला
शिंदे गटातील वकील हरीश साळवे यांचे एका अहवालांनुसार एका दिवसाचे कामाचे शुल्क हे ३० लाखांच्या घरात आहे. गेल्यावर्षी हऱीश साळवे यांनी कुलभुषण जाधव यांच्यासाठी वकिली केली होती. या प्रकरणात त्यांनी फक्त १ रूपया फी घेतली होती. पण इतर वेळेस ते फक्त बड्या केसेसच घेतात आणि त्यात ते प्रत्येक तासाला काही लाख तर एका दिवसांसाठी २५ ते ३० लाख रूपये घेत असल्याची चर्चा रंगली आहे. शिंदे गटातील मंत्र्यांना मंत्रालयात हजर राहण्याची याचिका असिम सोरोदी यांनी न्यायालयात दाखल केली आहे. तसेच त्यांच्यावर आजच सुनावणी करण्यात यावी, अशी देखील त्यांनी केली आहे. तर नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे यांनी आता शिल्लक सेना करून घ्यावं, अशी खोचक टिप्पणी केली आहे.
“अजित दादांनी शिवसेनेचा निधी थांबवण्याचं काम केलं”;श्रीकांत शिंदेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यागटात सध्या 51 आमदारांचा पाठबळ असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. तसेच आज दोन तृतीयांश पेक्षा शिवसेना आमदार असून 39 आमदार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे आता सरकार अल्पमतात आल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आम्ही सरकार स्थापन कऱण्याचा दावा करणार असल्याचं बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
Read also:
- बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला लावून बसताना याचना होत नाहीत का?
- शिंदे गटाच्या वकिलाची फी एका दिवसाची तब्बल ३० लाख; ठाकरे अन् शिंदे गटाची न्यायालयात सुनावणी
- “राणा बाई थोडी कळ काढा, हि शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील”
- काय ती झाडी, काय तो डोंगर, म्हणणाऱ्या बंडखोर आमदाराला राऊतांनी फटकारलं
- बंडखोर आमदारांची सुरत, गुवाहाटीवरून आता गोव्यात स्वारी; भाजपच्या 3 नेत्यांकडे जबाबदारी ?