मुंबई : शिवसेनेच्या बंडखोरीमागे अजित पवार यांनी विकास निधी न दिल्याचा आरोप बंडखोर आमदार करीत आहेत. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत कोणतीही युती करणार नसल्याच म्हणत एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच निलंबित बंडखोर आमदारांवर न्यायालयात सुनावणी होणार आहे.
“अजित दादांनी शिवसेनेचा निधी थांबवण्याचं काम केलं”;श्रीकांत शिंदेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
अर्थमंत्री अजित पवारांनी प्रत्येक आमदाराला त्या त्या मतदारसंघात भरघोस निधी दिला व प्रत्येक आमदारांचा तितकाच सन्मान केला. पक्षपात न करता सर्वांना मविआ सरकारने सन्मानाने वागवले मात्र आज केवळ पळवाट शोधण्याकरिता विकास निधीच्या मुद्द्यावरून केवळ नौटंकी सुरू आहे. अशी टिका अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटावर केली आहे. कोरोनाच्या काळात खासदारांना एक छदामही माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दिली नाही त्यावेळी माविआ सह भाजपच्या सर्व आमदारांना अजित स्थानिक आमदार विकास निधी दिला , इतकच काय तर हा निधी दोन कोटी वरून पाच कोटी पर्यंत वाढवला. असंही ते म्हणाले.
लक्षात ठेवा..! शिंदे साहेबांमुळे शांत बसलो आहे; ठाण्यात श्रीकांत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन
शिंदे गटातील १५ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेच दोन गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. एक तर आमदारांनी उपाध्यक्षांना बेकायदेशीय ठरवून आमदारांना अपात्र नोटिशीला आव्हान दिले आहे. दुसरे म्हणजे त्यांनी स्वत: ला आणि आपल्या कुटुंबाला न्यायालयाकडून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकिल हरीश साळवे आज सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. त्यावेळी शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने देवदत्त कामत लढणार आहे. तर उपाध्यक्षांसाठी अधिवक्ता रविशंकर जंध्याला लढणार आहे. आमदारांच्या वतीने दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहे.
“राष्ट्रवादी- काॅंग्रेसकडून शिवसेना हायजॅक, आम्ही अजूनही शिवसेनेतच”; बंडखोर आमदार दिपक केसरकर
दरम्यान, शिंदे गटातील वकील हरीश साळवे यांचे एका अहवालांनुसार एका दिवसाचे कामाचे शुल्क हे ३० लाखांच्या घरात आहे. गेल्यावर्षी हऱीश साळवे यांनी कुलभुषण जाधव यांच्यासाठी वकिली केली होती. या प्रकरणात त्यांनी फक्त १ रूपया फी घेतली होती. पण इतर वेळेस ते फक्त बड्या केसेसच घेतात आणि त्यात ते प्रत्येक तासाला काही लाख तर एका दिवसांसाठी २५ ते ३० लाख रूपये घेत असल्याची चर्चा रंगली आहे. शिंदे गटातील मंत्र्यांना मंत्रालयात हजर राहण्याची याचिका असिम सोरोदी यांनी न्यायालयात दाखल केली आहे. तसेच त्यांच्यावर आजच सुनावणी करण्यात यावी, अशी देखील त्यांनी केली आहे. तर नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे यांनी आता शिल्लक सेना करून घ्यावं, अशी खोचक टिप्पणी केली आहे.
Read also:
- “राणा बाई थोडी कळ काढा, हि शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील”
- काय ती झाडी, काय तो डोंगर, म्हणणाऱ्या बंडखोर आमदाराला राऊतांनी फटकारलं
- बंडखोर आमदारांची सुरत, गुवाहाटीवरून आता गोव्यात स्वारी; भाजपच्या 3 नेत्यांकडे जबाबदारी ?
- पत्रकारांना चकवा देत ‘एकनाथ शिंदे’ काल गुजरातमध्ये; फडणवीससोबत चर्चा झाल्याची माहिती
- देवा लवकर आटप रे हे सगळं..! हॅाटेलचे बिल वाढतेय; दिपाली सय्यदचा खोचक टोला