मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख असून एकनाश शिंदे हे गटनेते आहेत या गटनेते पदावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच त्यांना बसवले आहे, त्यामुळे दोघेही आमचे नेते आहेत. त्यात काही गैर नाही, असं बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी आज बंडखोर नेत्यांची बाजू मांडताना एक पत्र देखील लिहिलं आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्रीपदावरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
“आम्ही संपणार नाही, थांबणार नाही, माघार घेणार नाही”; बंडखोर आमदारांची भूमिका
दिपक केसरकर यांना मुंबईत कधी येणार ?असा सवाल विचारला तेव्हा ते म्हणाले की, हे एकनाथ शिंदे ठरवतील. तसेच आम्हाला उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहे. जनमताचा कौलाप्रमाणे युतीच सरकार हवं होतं. शिंदे मुख्यमंत्री झाले असते तर बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली असती. पवारांनी हट्ट केला नसता तर शिंदे मुख्यमंत्री असते, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.
राजकीय हस्तक्षेप झालेल्या मतदार याद्या बदला, अन्यथा..; विधान परिषद आमदार उमा खापरेंचा इशारा
तुम्ही आपला नेता कोणाला मानता? त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की, ‘उद्धवजी ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख आहेत आणि एकनाथ शिंदे हे आमचे गटनेते आहेत आणि या गटनेते पदावर उद्धवजी ठाकरे यांनीच त्यांना बसवले आहे त्यामुळे दोघेही आमचे नेते आहेत, त्यात काही गैर नाही.’ आम्ही जी लढाई सुरू केली होती ती आता संपत आली आहे, असे मला तरी वाटते, असंही ते म्हणाले.
“मान कापली तरी गुवाहाटीला जाणार नाही, मला अटक करा”; ईडीचं समन्सनंतर राऊतांची प्रतिक्रिया
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे 21 तारखेला राजीनामा देणार होते. त्यानंतर 22 तारखेला सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत होते. पण दोन्ही दिवशी श्री शरद पवारजी यांनी त्यांना थांबवल्याची बातमी न्यूज 18 या इंग्रजी वाहिनीने दिली आहे. तसेच आज शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा देण्याचा पत्र देखील तयार झालं असल्याची माहिती समोर आली आहे.
Read also:
- “राज्य सरकारचा पाठिंबा कोर्टात नाही तर राज्यपालांकडे जाऊन सांगायचा असतो”; जयत पाटलांचा शिंदेंना टोला
- “राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावुन आलं पाहिजे”; रूपाली पाटील
- “बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा अन् धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय”;
- आता तर विठ्ठलाची महापुजा ‘उद्धव ठाकरेचं’ करणार; SC च्या निकालानंतर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया
- बंडखोर आमदारांना केंद्र अन् राज्याने सुरक्षा द्यावी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय