मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आता राज्यात मोठा पेच निर्माण झाला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना एकनाथ शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्रतेबाबत निर्णय 11 जुलै पर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाला एकप्रकारे दिलासा मिळाला असून त्यांना आता सत्तास्थापनेचा दावा करू शकतो.
राजकीय हस्तक्षेप झालेल्या मतदार याद्या बदला, अन्यथा..; विधान परिषद आमदार उमा खापरेंचा इशारा
यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतला असेल तर तो न्यायालयात काढून घ्यायचा नसतो. तो राज्यपालांकडे जाऊन सांगायचा असतो. पाठिंबा काढून घेतला तर त्या सर्वांंचं निलंबन होईल. सध्या ते शिवसेनेत आहेत. शिवसेनेचा निर्णय त्यांना बंधनकारक आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. स्वत:च्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर अविश्वास किंवा पाठिंबा काढून घेण्याचा प्रयत्न शिंदे गट करेल, असंही ते म्हणाले.
“मान कापली तरी गुवाहाटीला जाणार नाही, मला अटक करा”; ईडीचं समन्सनंतर राऊतांची प्रतिक्रिया
सध्या बंडखोर आमदारांनी महाराष्ट्राची लक्तरे सुरत वरून गुवाहाटीला नेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जनता या गोष्टीला विटून गेली आहे. अशा परिस्थितीत स्वत: अंतर्गत भांडणं विसरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंचा देखील उल्लेख केला.
“बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात राऊतांच्या इशारा देणाऱ्या भाषणाच्या लिंक दिल्या”
केंद्र सरकारकडून जो केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्यानेच काही आमदारांनी बंडखोरी पत्काराली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने लक्ष्मण आपल्या रामासाठी उभा होता. त्याचमुळे हिंदुत्व शिकवणाऱ्या भावांनी एकत्र येणे गरजेचे आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, मात्र शेवटची ते बाळासाहेब ठाकरेंचं पुतण्या आहेत. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबीयांनी दाखवून दिलं पाहिजे की आम्ही खरे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहोत. असंही रूपाली पाटील म्हणाल्या.
Read also:
- “राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावुन आलं पाहिजे”; रूपाली पाटील
- “बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा अन् धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय”;
- आता तर विठ्ठलाची महापुजा ‘उद्धव ठाकरेचं’ करणार; SC च्या निकालानंतर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया
- बंडखोर आमदारांना केंद्र अन् राज्याने सुरक्षा द्यावी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- “आम्ही संपणार नाही, थांबणार नाही, माघार घेणार नाही”; बंडखोर आमदारांची भूमिका