मुंबई : राजभवनाच्या झाडीझुडपात गेल्या अडीच वर्षापासून 12 आमदार टेबलावर पडून राहिले आहेत. त्या 12 आमदाराला आपण न्याय का? देऊ शकले नाही. याचा तपास करायला हवा. तसेच त्यांचा आता कोरोना बरा झाला असेल अशी आशा ठेवतो आणि त्या आमदारांची फाईल क्लिअर करावी असा टोला संजय राऊतांनी राज्यपालांना लगावला आहे. तसेच त्यांनी या डबक्यात राज्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पडू नये असा सल्ला देखील त्यांनी दिला.
“बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा अन् धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय”;
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी नंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या बैठका सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 116 आमदारांचं बळ असून ते विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे सांभाळत आहेत. इतका मोठा विरोधी पक्ष महाराष्ट्रात निर्माण झाला नव्हता. त्यामुळे हा विरोधी पक्ष चांगले विधायक कामे करू शकतो आणि महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. असंही राऊत म्हणाले.
आता तर विठ्ठलाची महापुजा ‘उद्धव ठाकरेचं’ करणार; SC च्या निकालानंतर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद संभाळलं आहे. त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. पंरतु राज्यात जे काही डबकं झालं आहे. त्या डबक्यात त्यांनी उतरू नये, कारण त्यांची अप्रतिष्ठा होईल. कारण डबक्यात बेडूक राहतात. त्यामध्ये उतरल्यावर त्यांची तसेच नरेंद्र मोदींची अप्रतिष्ठा होईल. तसेच देवेंद्र फडणवीस त्या डबक्यात उतरणार नाही याची मला खात्री आहे. असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
बंडखोर आमदारांना केंद्र अन् राज्याने सुरक्षा द्यावी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
दरम्यान, संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, दुसऱ्यांना रिक्षावाला, पानटपरीवाला, भाजी विकणारा, वॉचमन, म्हणण्याऱ्या लोकांनी हे विसरू नये ते स्वत: लोकप्रभामध्ये कारकून होते. तेथून उचलून राजसाहेबांनी तुम्हाला सामनाचे संपादक बनवलं असा टोला संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना लगावला आहे. यावर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “कारकुनच्या पदावरून उचलून राजसाहेबांनी सामानाचा संपादक बनवला”; मनसेचा राऊतांना टोला
- “मनसे हा पक्ष नसून डिपॉझिट जप्तची मशिन”; दिपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं
- “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं; बंडखोर आमदार दिपक केसरकर
- “राज्य सरकारचा पाठिंबा कोर्टात नाही तर राज्यपालांकडे जाऊन सांगायचा असतो”; जयत पाटलांचा शिंदेंना टोला
- “राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावुन आलं पाहिजे”; रूपाली पाटील