मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा आज आठवा दिवस असून राज्यात अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. बंडखोर तब्बल 8 मंत्र्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाती काढून घेतली आहेत. तर बंडखोर आमदारांना समर्थन देणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांना विविध पदावरून हटवण्यात आले आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरचा झटका दिला आहे.
“मनसे हा पक्ष नसून डिपॉझिट जप्तची मशिन”; दिपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं
ठाण्यातील शिवसेनेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. आता ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी कारवाई होत असल्याचे सांगत हाकालपट्टी करण्यात आली आहे.
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं; बंडखोर आमदार दिपक केसरकर
त्याआधी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. याबद्दल म्हस्के यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, गेले अडीच वर्ष आपल्या संघटनेची राष्ट्रवादी गळचेपी चालली आहे. त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. मात्र आपण शिवसैनिक होतो आहे आणि राहणारच असेही त्यांनी त्यात म्हटलं आहे.
“राज्य सरकारचा पाठिंबा कोर्टात नाही तर राज्यपालांकडे जाऊन सांगायचा असतो”; जयत पाटलांचा शिंदेंना टोला
एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेण्यात आली असून, त्यांनी गेल्या महिन्याभरात घेतलेल्या निर्णयांच्या सर्व फायली ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री कार्यालयाने सुरू केली आहे. त्यातून काही मंत्र्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. काल मुंबई उच्च न्यायालयात एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका ही ॲड.असीम सरोदे यांच्या मदतीने 7 नागरिकांनी दाखल केली आहे.
Read als
- “लवकर निर्णय घ्या”; बंडखोर आमदारांचं मुख्यमंत्र्यांना शेवटचं आज अल्टिमेटम
- ‘शिंदे साहेब सोडून जाऊ नका, आम्ही उद्धव साहेबांना समजावून सांगतो’
- “महाराष्ट्रातील १४४ चा आकडा गाठण्यासाठी भाजपाने आसाममध्ये १२६ जणांकडे दुर्लक्ष केले”
- “बेडकाच्या डबक्यात भाजपने उतरू नये, नाहीतर फडणवीस, मोदींची अप्रतिष्ठा होईल”
- “कारकुनच्या पदावरून उचलून राजसाहेबांनी सामानाचा संपादक बनवला”; मनसेचा राऊतांना टोला