मुंबई : गुवाहाटी आणि मुंबईतून सध्या फक्त पत्रव्यवहार महाराष्ट्रातील जनतेला बघायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला, असं बंडखोर आमदारांकडून सांगण्यात येतंय, मात्र ते अजून स्पष्ट झालं नाही. एकाबाजूला आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना दिसत आहेत. तर अजूनही तुम्ही मनाने शिवसैनिक आहेत. असं भावनिक आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत.
“बेडकाच्या डबक्यात भाजपने उतरू नये, नाहीतर फडणवीस, मोदींची अप्रतिष्ठा होईल”
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. असंही उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन केलं आहे.
“कारकुनच्या पदावरून उचलून राजसाहेबांनी सामानाचा संपादक बनवला”; मनसेचा राऊतांना टोला
तसेच कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो की, अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन केलं आहे. आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दुर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
“मनसे हा पक्ष नसून डिपॉझिट जप्तची मशिन”; दिपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी भाजपसोबत जाण्याचं आजचं निर्णय घ्यावं. असं बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी सांगितलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आवाहानानंतर एकनाथ शिंदे गटाची लगेचच गुवाहाटीत बैठक सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता यावर काय निर्णय घेणार ? ते आता पहाणं महत्वाचं ठऱणार आहे.
Read als
- राजकीय गोंधळातही उद्धव ठाकरेंचा नवी मुंबई विमानतळाबाबत मोठा निर्णय
- एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंचा झटका! ठाण्याच्या माजी महापौरांची शिवसेनेतून हाकालपट्टी
- “लवकर निर्णय घ्या”; बंडखोर आमदारांचं मुख्यमंत्र्यांना शेवटचं आज अल्टिमेटम
- ‘शिंदे साहेब सोडून जाऊ नका, आम्ही उद्धव साहेबांना समजावून सांगतो’
- “महाराष्ट्रातील १४४ चा आकडा गाठण्यासाठी भाजपाने आसाममध्ये १२६ जणांकडे दुर्लक्ष केले”