मुंबई : राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस सोडा अशी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे सुरूवातीपासूनची मागणी आहे. यावर आता महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही फक्त मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा, असं आवाहन शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना केलं जात आहे. तसेच आता बंडखोर आमदारांनी याच दरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसवर जहरी टिका केली आहे. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“महाराष्ट्रातील १४४ चा आकडा गाठण्यासाठी भाजपाने आसाममध्ये १२६ जणांकडे दुर्लक्ष केले”
बंडखोर आमदार राष्ट्रवादीवर जे काही आरोप करीत आहेत. ते अगोदर राष्ट्रवादीमध्येच होते. असा टोला सुप्रिया सुळे यांनी बंडखोर आमदार दिपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यावर लगावला. जरी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला तरी त्यांच्या मनात आम्ही कधीही कटुता ठेवली नाही. एकादा माणुस आपल्या वडिलांच्या आणि नेत्यांच्या मनातील दोन मिनिटांचा जरी आनंद घेऊन गेला तरी त्या नेत्यांच्या विरोधात मी कधीही बोलणार नाही. कारण जेव्हा आपण एका ताटात आपण कधीतरी जेवण केलं आहे. त्या मिठाला जागायाला महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहु फुले आंबेडकरांनी शिकवलं आहे. असंही ते म्हणाले.
“बेडकाच्या डबक्यात भाजपने उतरू नये, नाहीतर फडणवीस, मोदींची अप्रतिष्ठा होईल”
बंडखोर आमदार जे काही आरोप करीत आहेत. त्यांनी संविधानाचा आधार घेऊन अगोदर समोरासमोर बसून चर्चा करायला हवी. सभागृहात लोकप्रतिनिधी असताना अनेक मतभेद होतात, मात्र चर्चेतूनच मार्ग निघतो. तसेच राजकीय वातावरणावर बोलताना त्या म्हणाल्या की उद्धव ठाकरें यांनी मोठा भाऊ म्हणून सर्वच पोटात घेतलं आहे. त्यामुळे त्यांनी देखील याबाबत विचार करायला हवा. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
“कारकुनच्या पदावरून उचलून राजसाहेबांनी सामानाचा संपादक बनवला”; मनसेचा राऊतांना टोला
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत मुख्यमंत्री राजीनाम्याबाबत चर्चा कऱणार का? त्याकडे देखील लक्ष लागून राहिलं आहे. तसेच उद्या एकनाथ शिंदे हे केंद्राच्या सुरक्षेत मुंबईत येण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदार दिपक केसरकर आणि उदय सामंत यांनी देखील राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Read als
- “भूल थापांना बळी पडू नका, आजही तुमची काळजी वाटते, मुंबईत या” उद्धव ठाकरे
- राजकीय गोंधळातही उद्धव ठाकरेंचा नवी मुंबई विमानतळाबाबत मोठा निर्णय
- एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंचा झटका! ठाण्याच्या माजी महापौरांची शिवसेनेतून हाकालपट्टी
- “लवकर निर्णय घ्या”; बंडखोर आमदारांचं मुख्यमंत्र्यांना शेवटचं आज अल्टिमेटम
- ‘शिंदे साहेब सोडून जाऊ नका, आम्ही उद्धव साहेबांना समजावून सांगतो’