मुंबई : गुवाहाटी आणि मुंबईतून सध्या फक्त पत्रव्यवहार महाराष्ट्रातील जनतेला बघायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला, असं बंडखोर आमदारांकडून सांगण्यात येतंय, मात्र ते अजून स्पष्ट झालं नाही. एकाबाजूला आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना दिसत आहेत. तर अजूनही तुम्ही मनाने शिवसैनिक आहेत. असं भावनिक आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत. यावर आता एकनाश शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे.
एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंचा झटका! ठाण्याच्या माजी महापौरांची शिवसेनेतून हाकालपट्टी
एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“लवकर निर्णय घ्या”; बंडखोर आमदारांचं मुख्यमंत्र्यांना शेवटचं आज अल्टिमेटम
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. असंही उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन केलं आहे.
‘शिंदे साहेब सोडून जाऊ नका, आम्ही उद्धव साहेबांना समजावून सांगतो’
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी भाजपसोबत जाण्याचं आजचं निर्णय घ्यावं. असं बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी सांगितलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आवाहानानंतर एकनाथ शिंदे गटाची लगेचच गुवाहाटीत बैठक सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता यावर काय निर्णय घेणार ? ते आता पहाणं महत्वाचं ठऱणार आहे.
Read als
- “राजकीय अस्थिरता असताना सरकारने एकाच वेळी 160 जीआर काढले”; भाजपचं राज्यपालांना पत्र
- “राजकीय अस्थिरता असताना सरकारने एकाच वेळी 160 जीआर काढले”; भाजपचं राज्यपालांना पत्र
- ” जे आरोप करीत आहेत, ते अगोदर राष्ट्रवादीमध्येच होते”; सुप्रिया सुळेंचा बंडखोर आमदारांवर निशाणा
- “भूल थापांना बळी पडू नका, आजही तुमची काळजी वाटते, मुंबईत या” उद्धव ठाकरे
- राजकीय गोंधळातही उद्धव ठाकरेंचा नवी मुंबई विमानतळाबाबत मोठा निर्णय