मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या राजकीय गोंधळात राज्य सरकारने सर्वात जास्त 160 जीआर एकाच वेळी काढण्याने अनेकांना धक्का बसला आहे. तसेच या जीआर च्या माध्यामातून सरकारने 319 कोटी रूपयांचा निधी देखील वितरीत केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यावर आता विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला असून त्यांनी यासंदर्भात राज्यपालांना देखील पत्र लिहिलं आहे.
‘शिंदे साहेब सोडून जाऊ नका, आम्ही उद्धव साहेबांना समजावून सांगतो’
तीन दिवसांपूर्वी मी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना विरोधी पक्षनेता या नात्याने पत्र लिहिले की शेकडोंच्या संख्येने जीआर काढले जात आहेत, त्यावेळी 160 जीआर एकाच वेळी काढले गेले होते. जनहिताचे सारे जीआर असते तरी आपण समजू शकलो असतो परंतु शेकडों जीआर यामध्ये गैरव्यवहार होण्याची दाट शक्यता आहे. काही लोकांचे हित साधण्यासाठी घाईगडबडीत हे जीआर काढले गेले. राज्यामध्ये राजकीय अस्थिरता आहे आणि सरकार आज अल्पमतात आहे, अशावेळी असे निर्णय घेणे उचित नाही. त्यामुळे राज्यपालांनी तात्काळ अशाप्रकारचे जीआर थांबवावेत व त्यात हस्तक्षेप करुन योग्य कार्यवाही करावी यासाठी राज्यपालांकडे मागणी केली, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्रातील १४४ चा आकडा गाठण्यासाठी भाजपाने आसाममध्ये १२६ जणांकडे दुर्लक्ष केले”
महाराष्ट्राचे राज्यपाल अत्यंत सतर्क आहेत, अशाप्रकारचे पत्र जाताच राज्याची परिस्थिती पाहून त्यांनी जो हस्तक्षेप केला व जीआरच्या संदर्भात उत्तर मागवले त्याबद्द्ल महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. शेवटी हा लोकांचा पैसा आहे आणि सरकारच्या माध्यमातून लोकांच्या पैशाचा असा अपव्यय होऊ नये यासाठी आम्ही अशाप्रकारची भूमिका घेतली. सरकार अस्थिर व अल्पमतात असताना ही अशाप्रकारचे निर्णय घेणे योग्य नव्हते परंतु पत्र दिल्यावरही असे निर्णय झाले याचा अर्थ त्यांना कशाचीही भीतीच उरलेली नाही. केवळ निर्णय घ्या, पैसे कमवा, गैरव्यवहार करा अशाप्रकारचा उद्देदश सरकारचा दिसत आहे. असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
“बेडकाच्या डबक्यात भाजपने उतरू नये, नाहीतर फडणवीस, मोदींची अप्रतिष्ठा होईल”
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर बंडखोर आमदारांना अपात्रतेबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. याची सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. या मधल्या काळात त्यांना आता राजभवनात सत्ता स्थापन करून संख्याबळ दाखवण्याची संधी आहे. मात्र यावर आता भाजप आणि एकनाश शिंदे गट काय भूमिका घेणात ते आता पहाणं महत्वाचं ठऱणार आहे.
Read als
- ” जे आरोप करीत आहेत, ते अगोदर राष्ट्रवादीमध्येच होते”; सुप्रिया सुळेंचा बंडखोर आमदारांवर निशाणा
- “भूल थापांना बळी पडू नका, आजही तुमची काळजी वाटते, मुंबईत या” उद्धव ठाकरे
- राजकीय गोंधळातही उद्धव ठाकरेंचा नवी मुंबई विमानतळाबाबत मोठा निर्णय
- एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंचा झटका! ठाण्याच्या माजी महापौरांची शिवसेनेतून हाकालपट्टी
- “लवकर निर्णय घ्या”; बंडखोर आमदारांचं मुख्यमंत्र्यांना शेवटचं आज अल्टिमेटम