मुंबई : बंडखोर आमदारांचं प्रकरण 11 जुलै पर्यंत प्रलंबित असताना सरकारला बहुमत सिद्ध करण्याची राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. विरोधी पक्ष नेते राज्यपालांची भेट घेतात आणि ताबोडतोब राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगतात. त्यामुळे ते देखील केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
गोव्यामध्ये ‘ताज कनेक्शन’; बंडखोर आमदारांना गुवाहाटीहून गोव्याला नेण्यासाठी स्पाईंसजेटचे विमान रवाना
सुख:दुखात ज्यांच्यासोबत मैत्री केली आहे त्यांच्याशी नेहमी प्रामाणिक राहायचं अशी काॅंग्रेसची नेहमी भूमिका राहिली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत भाजपला उच्च न्यायलायने फटकारलं होतं. हे विधिमंडळात काम असून आमच्याकडे येण्यांच काम नाही असे आदेश त्यावेळी भाजपला दिले होते. त्यानंतर भाजप सर्वोच्च न्यायालयात गेली मात्र ते प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. असंही ते म्हणाले.
आमदारांनो उद्या सकाळपर्यंत मुंबईत या..! भाजपच्या सर्व आमदारांना वरिष्ठांकडून फोन
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, शिवसेनेने सध्या आपला गटनेता बदलेला असून आहे. तरी देखील भाजपच्या पत्रामुळे राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. भाजपने मागील सरकार देखील अंधारात केलं होतं आणि काल देखील आमावस्या संपेपर्यंत नोटीस काढली. बंडखोर आमदारांबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायलायत 11 जुलै पर्यंत असताना राज्यापालांनी बहुमत करण्याचे आदेश काढावेत. हा मोठा चमत्कार झाला आहे. त्यामुळे ही संविधानाच्या कलमाचं उल्लघंन होत असल्याने ही गोष्ट महाराष्ट्रासाठी खेदजनक आहे.
“एका बाजुला डुकरं, रेडा, कुत्रा, नाल्याची घाण म्हणायचं अन् दुसऱ्या बाजूला समेटची हाक द्यायची”
दरम्यान, गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु हॉटेलमधून बंडखोर आमदार दोन लक्झरी बसने कामाख्या देवीच्या दर्शनासाठी निघाले. यावेळी रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिराच्या परिसरात जात असताना बच्चू कडू यांनी जादूटोणा केला म्हणून दर्शनासाठी जात असल्याचं सांगत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तर कामाख्या देवीच्या कृपेने सर्व काही होईल, उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत जाणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Read als
- कुठे आणुन ठेवलीय बाळासाहेबांची शिवसेना? राजकीय नाट्यमय घडामोडींवर मनसेचा सवाल
- “शिंदेसाहेब शिवसेना हरता कामा नये”; दिपाली सय्यद यांचा सुर बदलला
- जादूटोणा केलायं म्हणून दर्शनासाठी जातोय; कामाख्या देवीच्या दर्शनावेळी बच्चू कडूंचा उपरोधित टोला
- गोव्यात भाजपचा शिजतोय मेगाप्लॉन; बंडखोर अन् भाजपचे आमदार आज गोव्यात दाखल होणार?
- बंडखोर आमदारांचा आसाममध्ये मास्टरस्टोक; महाराष्ट्रात येण्यापुर्वी आसामबाबत घेतला ‘हा’ निर्णय