मुंबई : राज्यपालांच्या आदेशानंतर उद्धव ठाकरे यांना उद्या बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्याआधी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पुणे शहराचे नाव जिजाऊनगर करा अशी मागणी केली आहे. तसेच औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव बदलण्यात यावे अशी देखील मागणी केली आहे.
कुठे आणुन ठेवलीय बाळासाहेबांची शिवसेना? राजकीय नाट्यमय घडामोडींवर मनसेचा सवाल
आज झालेल्या मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे यांनी निर्णयाचा धडका लावला आहे. यामध्ये उस्मानाबाद शहराचं नाव “धाराशीव” तर औरंगाबाद शहराचे नाव “संभाजीनगर” करण्यास मान्यता दिली आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता दिली आहे. तसेच राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन केला जाणार असून कर्जत जि. अहमदनगर येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन केला जाणार आहे.
“शिंदेसाहेब शिवसेना हरता कामा नये”; दिपाली सय्यद यांचा सुर बदलला
अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार. विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय असा निर्णय देखील घेतला आहे.
जादूटोणा केलायं म्हणून दर्शनासाठी जातोय; कामाख्या देवीच्या दर्शनावेळी बच्चू कडूंचा उपरोधित टोला
मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक काॅंग्रेसचे दोन मंत्री बाहेर पडले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख हे मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर आले होते. त्यामुळे नामांतराचे प्रस्ताव मांडण्यात आल्याने काॅंग्रेस नाराज झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. तर बहुमत चाचणी वरून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे.
Read also
- उद्धव ठाकरेंचा शेवटचा मास्टरस्ट्रोक; अखेर औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’
- पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करा; कॅबिनेट मंत्रिमंडळात काॅंग्रेसची मोठी मागणी
- “शरद पवारांनी ज्या माणसांना जवळ घेतलं, त्यांना काखेत दाबून मारलं”
- “संजय राऊतांना योग्यवेळी चुना लावू”; गुलाबराव पाटलांचा कडक इशारा
- सुखात असो की दु:खात आम्ही शिवसेनेच्या पाठिशी राहणार