मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शेवटची कॅबिनेट बैठक पार पडली. कोरोनाची लागण झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक नामांतराबाबत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं समजत आहे. तसेच अजित पवार यांनी काॅंग्रेसवर संताप देखील व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरेंचा शेवटचा मास्टरस्ट्रोक; अखेर औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’
कॅबिनेट बैठकीत काॅंग्रेसचे मंत्री सुनील केदार यांनी पुण्याचे नाव जिजाऊनगर करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की, ही सहकारी संस्थांची बैठक नाही. त्यामुळे जिजाऊनगर असं नामांतर करण्याला आमचा विरोध नाही. पण आम्हाला पुण्याच्या मंत्र्यांना विचारून तरी प्रस्ताव आणा, असं म्हणत अजित पवारांनी काॅंग्रेसला फटकारलं. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आपल्या विभागातील फाईल्स अजित पवारांनी रोखल्याची नाराजी व्यक्त केली. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, प्रत्येक फाईल्स २० ते २५ हजार कोटींची असेल तर मंजूर कशी करणार. ? तसेच एवढ्या मोठ्या तरतुदींवर चर्चा झाल्याशिवाय फाईल्स मंजूर करायच्या का ? असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थित केला.
पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करा; कॅबिनेट मंत्रिमंडळात काॅंग्रेसची मोठी मागणी
मंत्रिमंडळाच्या बैठकीत उस्मानाबाद शहराचं नाव “धाराशीव” तर औरंगाबाद शहराचे नाव “संभाजीनगर” करण्यास मान्यता दिली आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता दिली आहे. तसेच राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन केला जाणार असून कर्जत जि. अहमदनगर येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन केला जाणार आहे.
“शरद पवारांनी ज्या माणसांना जवळ घेतलं, त्यांना काखेत दाबून मारलं”
अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार. विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय असा निर्णय देखील घेतला आहे.
Read also
- ..त्यादिवशी नक्कीच सत्याचा विजय होईल; रोहित पवारांचं सुचकं वक्तव्य
- “लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही”; रूपाली चाकणकरांचं ट्विट व्हायरल
- काय ती झाडी, काय तो डोंगार? एकदम ओके सरकार; अमोल मिटकरींचा खोचक टोला
- देवेंद्र फडणवीसांचं ‘असं’ असेल नवे मंत्रिमंडळ; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी
- “मला माझ्याच लोकांनी दगा दिला”; उद्धव ठाकरेंनी घेतले 10 ऐतिहासिक निर्णय