पुणे : संपुर्ण राज्यभरातून मनसेने पुण्याच्या लोकसभेसाठी अधिकच लक्ष केंद्रीत केलंय. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली, परंतु याठिकाणी अद्यापही निवडणूक झाली नाही. यातच पुढच्या वर्षात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मनसेने चांगलीच कंबर कसलीय. राज ठाकरे देखील सातत्याने पुणे दौरा करत आहेत. यातच पुढच्या महिन्यात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे ठाकरे पुणे दौऱ्यावर येत आहेत. परंतु त्याआधी आता उमेदवारीवरून मनसेचे नेते दावा सांगत आहेत.
हेही वाचा..पदाधिकाऱ्यांना ८० गाड्या घेण्यासाठी अजित पवारांकडे १५ कोटी रूपये आले कुठून ? अंजली दमानियांचा सवाल
पुण्यातील फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे सुरूवातीपासून पुणे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. त्यांनी तसा प्रचार देखील सुरू केलाय. पुण्याच्या ठिकठिकाणी भावी खासदार म्हणून वसंत मोरेंची जोरदार पोस्टरबॉजीही केलीय. मात्र यातच आता राज ठाकरेंनी आदेश दिला तर मी देखील पुणे लोकसभेची जागा लढवणार, असं पुणेचे शहाराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मनसेकडून कुणाला उमेदवारी देण्यात येईल? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा..“एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे ‘या’ महिन्यात एकत्र येणार”, शिंदे गटाच्या आमदाराने आतली बातमी फोडली
दरम्यान, राज ठाकरे यांनी जर आदेश दिला तर पुणे लोकसभा लढण्यासाठी तयार आहे. परंतु मनसे पक्ष असा आहे की राज ठाकरे जोपर्यंत निर्णय घेत नाही. तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. पण पुण्यात मनसेचा खासदार होईल हे मात्र नक्की आहे. रेल्वे इंजिन ज्याच्या नावासमोर असेल त्यासाठी आम्ही तयारी करणार. मग ते वसंत मोरे असतील किंवा इतर कोणी? परंतु राज ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अस साईनाथ बाबर यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा.एकनाथ शिंदे अन् राज ठाकरेंच्या भेटीवर आव्हाडांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, मार्चमध्ये हनिमुनला जातील अन् त्यानंतर…
हेही वाचा..“खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, चप्पल घालायला पैसे राहणार नाहीत,”महाजनांचं जोरदार प्रत्युत्तर, खडसे-महाजन वाद पेटला
हेही वाचा…“मिटकरी.. “आमदार” लिहिताना लाज वाटेल असं वागू नका,” सुळे आणि कोल्हेंवर केलेली टिका मिटकरींना भोवली
हेही वाचा…सुप्रिया सुळेंनी बारामतीत ठोकला तळ ; दहा महिने बारामतीतच राहणार, निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात
हेही वा“जयंत पाटील राष्ट्रवादीत किती दिवस राहणार, याची शाश्वती नाही”