पुणे : कर्जतच्या सभेत लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर अजित पवारांनी बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार निवडून आणणारच असा जाहीर वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. अजित पवारांच्या या वक्तव्याचा धसका आता खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी घेतला आहे. यातच दहा महिने आपल्या मतदारसंघातच तळ ठोकून राहणार असल्याचं विधान सुप्रिया सुळे यांनी दौंड येथील एका सभेत केलं आहे.
हेही वाचा…“राऊतांची तुलना महाभारतातील मंथरेशी ;” भाजपच्या महिला नेत्याने राऊतांना खडसावलं
शिरूरचा आपला उमेदवार निवडून आणणारच असा थेट इशारा अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना दिलाय. त्यातच आता अमोल कोल्हे यांनी आपल्या मतदारसंघातून शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरूवात केली आहे. त्यावरूनही अजित पवारांनी कोल्हेंना फडकारलं होतं. त्यातच आता आगामी काही महिन्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे दहा महिने मी दिल्ली आणि मुंबईला जाणार नाही. आपल्या मतदारसंघातच राहिन असं जाहिरपणे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. नवऱ्या आणि मुलांना सांगितलं आहे की ऑक्टोंबरपर्यंत बायको आणि आईला जरा तिकडेच राहू द्या. एप्रिलमध्ये माझं एलेक्शन आहे तर ऑक्टोंबरमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे मी आता मुंबईला सुद्धा जाणार नाही. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा…मोठी बातमी : कल्याण, ठाणे ते धाराशिव, हातकणंगले, नाशिक, संभाजीनगर ते रामटेक, बुलढाणा, ठाकरे गटाच्या 23 जागा ठरल्या!
दरम्यान, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील एक खोचक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, बारामती आणि शिरूर लोकसभेतील विद्यमान खासदार आदरणीय सुप्रिया व अमोल कोल्हे साहेब गुडघ्याला बाशिंग बांधुन मैदानात उतरले आहेत. राज्यभर फिरणाऱ्या या दोन्ही मोठ्या नेत्यांना मतदार संघात अडकुन राहावे लागणे यातच अजितदादांचे महत्व अधोरेखित होते.
READ ALSO :
हेही वा“जयंत पाटील राष्ट्रवादीत किती दिवस राहणार, याची शाश्वती नाही”
हेही वाचा..पदाधिकाऱ्यांना ८० गाड्या घेण्यासाठी अजित पवारांकडे १५ कोटी रूपये आले कुठून ? अंजली दमानियांचा सवाल
हेही वाचा..“एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे ‘या’ महिन्यात एकत्र येणार”, शिंदे गटाच्या आमदाराने आतली बातमी फोडली
हेही वाचा.“ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलण्याशिवाय पर्याय नाही”, ठाकरेंचा हल्लाबोल, शिंदे अन् भाजपमधील नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश
हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी मागितल्या १२ जागा ; सुप्रिया सुळे म्हणाल्या…