लातूर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूर जिल्ह्यातल्या औसा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला निवडून दिले तर १00 कोटी रुपयांचा निधी देऊ, अशी ऑफर मतदारांना दिली आहे. औसा येथील नगरपालिकेच्या विकासकामाच्या शुभारंभासाठी आयोजित कार्यक्रमात पवार यांनी हजेरी लावली होती. पवारांचे वक्तव्य राजकीय वर्तुळात सध्या चांगलेच चर्चेत आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणे अयोग्य असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
“राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित होणार आहे की नाही?”
येत्या नगर पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कंबर कसली आहे. पालिकेत राष्ट्रवादीच्या पॅनलला निवडून आणण्यासाठी राजकीय नेत्यांनी युद्ध पातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. औसा नगर पालिकेत राष्ट्रवादीच्याच पॅनलला म्हणजे डॉ. अफसर शेख यांच्या पॅनलला निवडून दिले तरच मी तुम्हाला 100 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देतो, हा माझा शब्द आहे, असं अजित पवार यांनी कार्यक्रमात म्हटले . पवारांच्या या ऑफर औसा येथील जनता कशी पाहते , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“गोपीनाथ मुंडेंनी केंद्रावर दबाव आणून आरक्षण मिळवून दिलं असतं”
विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी औसा येथील समस्यांवर अजित पवार यांनी प्रकाश टाकला. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही लोक उघड्यावर शौचास बसतात, ही लाजिरवाणी बाब आहे. स्वच्छता अभियानात एकदाच पारितोषिक मिळवून चालणार नाही, तर त्यात सातत्य असणे आवश्यक आहे. यासाठी जनतेनेही पुढाकार घेणे गरजेचे आहे.
Read Also :
- किरीट सोमय्यांच्या रडारवर आता महाविकास आघाडीतील ‘हा’ नेता..
- “ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात”
- पेपरफुटी प्रकरण: जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर अभाविपची निदर्शने, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची उचलबांगडी
- निवडणुका रद्द होणार की ओबीसींशिवाय?; आज महत्वाचा दिवस, सुप्रीम कोर्टात सुनावणी
- संजय राऊतांना धक्का: ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल, भाजपा महिला नेत्यानी दिली तक्रार