मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमधील वाद आता विकोपाला पोहचला आहे. आज शासन आपल्या दारी असलेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीतून जाण्यास नकार दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एका जाहिरातीमुळे घोळ केला असा सुर आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“अनिल बोडेंनी आपली लायकी पाहून बोललं पाहिजे,” एकनाथ शिंदेंसाठी बच्चू कडू सरसावले
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही माहिती आहे की, आपण एकमेकांना साथ दिल्याशिवाय आपली सत्ता राहणार नाही. या दोन्ही नेत्यांजवळ जोपर्यंत १५५ आमदार आहेत. तोपर्यंत सरकार चालणार आहे. त्याच्यावर ते कशाला एकमेकांच्या संदर्भामध्ये अतंर पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्ता कशाला घालवतील? असाही सवाल अजित पवार यांनी केला.
हेही वाचा…“सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे, तुम्ही पक्षासाठी चांगलं काम करा”, एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
दरम्यान, पालघर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून पालघर येथे पोहचले. परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत जाण्यास फडणवीसांनी एकाच गाडीत जाण्यास नकार दिल्याने एकाच चर्चा आता होऊ लागली आहे. या कार्यक्रमास शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक देखील उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“हे फेविकॉल का जोड है..! तुटेगा नही..! आमची जोडी जयविरूसारखी”, एकनाथ शिंदे
हेही वाचा…नाराजीच्या चर्चा, फडणवीसांची विरोधकांना चपखल, “तुम्ही आमच्या प्रवासाची चिंता करू नका”
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्याचं नात नवरा-बायकोसारखं, त्यांना समाजाला घाबरून ‘घटस्फोट’ घेता येत नाही”
हेही वाचा…शिंदे-फडणवीस वाद पालघरला पोहचला, एकाच गाडीतून जाण्यास फडणवीसांचा नकार
हेही वाचा…“सुवर्णा करंजेंनी संजय राऊतांच्या भोंग्याला खरी जागा दाखवली”, नरेश म्हस्केंचा राऊतांवर हल्लाबोल