पालघर : शिवसेनेने दिलेल्या एका जाहिरातीवरून शिंदे गट आणि भाजपात धम्मचक्री सुरू आहे. दोन्ही गटाचे नेते आपापल्या नेत्यांसाठी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यास तयार झाले आहेत. खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बेडूक म्हणून उल्लेख केल्यानंतर शिंदे गटातील आमदार भाजपवर तुटून पडले आहेत. त्यामुळे महायुतीत आता मोठा भगदाड पडल्याचं चित्र तयार झालं आहे. यातच आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. त्यामुळे हा वाद आता निर्वाळा आहे का? असा प्रश्न निर्माण केला जात आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केले आहे.
हेही वाचा…एक साध्या पोलीस ऑफिसरकडे इतकी मालमत्ता कशी? अजित पवारांनी थेट यादीच वाचून दाखवली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझा एकत्रित प्रवास पंचवीस वर्षाचा आहे. पण गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट झाला आहे. त्याच्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कोणी करण्याचं कारण नाही. तो आज, काल आणि उद्यापण सोबत राहिल. कारण आम्ही सरकार खुर्च्या तोडण्यासाठी नाही तर जनसामान्यांच्या जीवनामध्ये सामाजिक, आर्थिक परीवर्तन करण्यासाठी केलं आहे. एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे या सरकारमध्ये काही होईल, एवढं तकलादू सरकार नाही आहे. हे जुनं सरकार आहे. कोणी आधी भाषण करायचं कोणी नंतर भाषण करायचं याच्या करता एकमेकांची गच्ची पकडणारे आम्ही बघितले. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलाच टोला हाणला.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..! संजय राऊतांच्या निकवर्तीयांनी केला शिंदे गटात प्रवेश
आज आपण या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा भूमिपूजन केलं. आरोग्याकडे विशेष लक्ष आपल्या सरकारचा माननीय मोदीजींनी आम्हाला या ठिकाणी येण्याचे नॅशनल हेल्थ मिशनच्या अंतर्गत 5000 कोटी रुपये दिलेले आहेत. त्या माध्यमातून जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये हेच इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार करतोय. आता अतिशय सुंदर आणि अद्यावत अशाप्रकारे रुग्णालय आम्ही तयार करतात आणि यापूर्वीच आपण घोषणा केली आहे. या ठिकाणी मेडिकल कॉलेज देखील आपण तयार करणार आहोत आणि त्याच्याही संदर्भात जागा लवकरच फिक्स होईल. त्या संदर्भात देखील कारवाई लवकर सुरू होईल. त्यामुळे एकीकडे हेल्थ मिशन आपण राबवतो आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकारने निर्णय केला. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“५० कुठं अन् १०५ कुठं? देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है.!” भाजपने शिंदेंना डिवचलं, महायुतीत मिठाचा खडा
दरम्यान, पालघर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून पालघर येथे पोहचले. परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत जाण्यास फडणवीसांनी एकाच गाडीत जाण्यास नकार दिल्याने एकाच चर्चा आता होऊ लागली आहे. या कार्यक्रमास शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक देखील उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्याचं नात नवरा-बायकोसारखं, त्यांना समाजाला घाबरून ‘घटस्फोट’ घेता येत नाही”
हेही वाचा…शिंदे-फडणवीस वाद पालघरला पोहचला, एकाच गाडीतून जाण्यास फडणवीसांचा नकार
हेही वाचा…“सुवर्णा करंजेंनी संजय राऊतांच्या भोंग्याला खरी जागा दाखवली”, नरेश म्हस्केंचा राऊतांवर हल्लाबोल
हेही वाचा…“अनिल बोडेंनी आपली लायकी पाहून बोललं पाहिजे,” एकनाथ शिंदेंसाठी बच्चू कडू सरसावले
हेही वाचा…“सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे, तुम्ही पक्षासाठी चांगलं काम करा”, एकनाथ शिंदेंचा थेट इशारा