पुणे : महाविकास आघाडी संदर्भात कोणाताही निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होत असतो. ते निर्णय तीनही पक्षाला मान्य असतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील एखाद्या नेत्याच्या वक्तव्यावरून कोणीही वेगळा अर्थ काढू नये. असं आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. राज्यात मागील काही दिवसापासून जागावाटपावरून चर्चा केल्या जात आहेत. त्यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“घोडामैदान जवळ आहे, मंत्री झालो नाही तर…” बच्चू कडू मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..?
महाविकास आघाडी एकजूट राहावी अशी आमची भूमिका आहे. स्टॅम्प पेपर द्या. मी लिहून देतो की महाविकास आघाडी पुढील निवडणुकीत शंभर टक्के एकत्र राहील, असा ठाम विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी जयंत पाटील यांच्यावर ईडीकडून झालेल्या चौकशीबाबतही भाजपला धारेवर धरलं. केंद्रीय आणि राज्यस्तरावरील यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. अशा चौकशींवर अनेक सत्ताधारी पक्षामध्ये गेलेल्या आमदारांनी आणि खासदरांनी जे वक्तव्य केले आहेत ते जनतेने पाहीले. वास्तविक सत्ताधाऱ्यांकडून द्वेष भावानेने, राजकीय सूडबुद्धीने या चौकशीसाठी कोणाला बोलवता येऊ नये असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.
हेही वाचा…राष्ट्रवादीत पुन्हा गटबाजी..! “सगळ्यांचा फोन आला, पण अजितदादांचा फोन आला नाही,” जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य
यंत्रणांच्या चौकशीसाठी कोणी गेल्यास त्यावर कोणतेही वक्तव्य माझ्याकडून करण्यात आलेले नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले मात्र या गोष्टीतून काही लोक जाणीवपूर्वक वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र असा चौकशींवर मी कोणतेही वक्तव्य करत नाही, अशी स्पष्ट भूमिका अजित पवारांनी माध्यमांसमोर मांडली.
हेही वाचा…भाजपविरूद्ध आघाडीने रणशिंग फुंकलं..! ‘१६ जून’ आघाडीचा मोर्चा महापालिकेवर धडकणार
त्र्यंबकेश्वर घटनेसंदर्भात माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून माहिती घेतील. यापूर्वीही अकोला, अहमदनगर, औरंगाबाद याठिकाणीही दंगलीच्या घटना घडल्या. यामध्ये कोणीही भावनिक मुद्दा करू नये, राजकारण आणू नये, जातीजातीत तेढ निर्माण होऊ नये असे आवाहन अजितदादांनी केले आहे. स्थानिक लोकांनाही त्याविषयी आवाहन केले. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असतात. सध्याचे गृहमंत्री याविषयी पाठपुरावा करत असले तरी ते नियंत्रणात येत नाही अशी टिपण्णी अजितदादा यांनी सरकारवर केली. अशा दंगलीमुळे गोरगरीब जनतेला त्याची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पोलिस प्रशासनाला योग्य कारवाई करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी अजित पवारांनी केली.
READ ALSO :
हेही वाचा…‘भावी मुख्यमंत्री’ होण्याचे लागले डोहाळे, राष्ट्रवादी, शिवसेनानंतर आता काॅंग्रेसलाही लागली लागण, नांदेडमध्ये झळकले बॅनर्स
हेही वाचा…“कर्नाटक निवडणुकीसारखा राज्यातील जनता निकाल देण्याच्या भीतीने ‘राष्ट्रवादी’ भाजपच्या टार्गेटवर”
हेही वाचा…“याद्या तयार, चेहऱ्यावर हसू, लोकसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसची बैठक, मोठी भरारी घेण्याच्या तयारीत
हेही वाचा…बहुमत असतांनाही आघाडीत बंडखोरी, राष्ट्रवादीचा सभापती, भाजपला दणका, परभणीच्या निवडणुकीची चर्चा
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा फोन आला, पण अजित दादांचा नाही, जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, मी माझ्या…