मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा दुसरा टप्पा अजून झालेला नाही. पहिल्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांच्या १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यातच दुसरा विस्तार कधी होणार ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावरून आता अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…” आघाडीत आता राष्ट्रवादीचं मोठा भाऊ,..” अजित पवार अन् पृथ्वीराज चव्हाणांमध्ये रंगला कलगीतूरा
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बच्चू कडू यांना विचारले असता. ते म्हणाले की, “जेवणाचं आमंत्रण हे जेवल्याशिवाय खरं नसतं. घोडामैदान जवळ आहे. मंत्री झालो नाही तरीही कामं करतोय. मंत्री झालो तर वेगाने काम करेन. पण मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला पाहिजे. विस्तार तातडीने झाला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री मिळणं आवश्यक आहे ही जनतेची मागणी आहे.” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…भाजपविरूद्ध आघाडीने रणशिंग फुंकलं..! ‘१६ जून’ आघाडीचा मोर्चा महापालिकेवर धडकणार
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं तेव्हा. बच्चू कडू यांनी राज्यमंत्रीपद सोडून शिंदेंच्या बंडात सहभाग घेतला होता. त्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्री पद मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यावरून सातत्याने विस्तार लवकरात लवकर करावा असं बच्चू कडू सांगत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीत पुन्हा गटबाजी..! “सगळ्यांचा फोन आला, पण अजितदादांचा फोन आला नाही,” जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…‘भावी पंतप्रधान’ म्हणून सातत्याने डिवचलं, शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले, “पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी..”
हेही वाचा…जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी, राष्ट्रवादीचं आंदोलन, फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“..तर संजय राऊत अंडासेलमध्ये असते..” शिंदे गटाच्या आमदारानी व्यक्त केली शक्यता
हेही वाचा…आघाडीत आता भाऊ बंदकी…! कोण मोठा भाऊ, कोण लहान भाऊ, ? जागावाटपावरून संघर्ष सुरू ?