पुणे : गेल्या काही वर्षापासून विरोधकांकडून सातत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘भावी पंतप्रधान’ म्हणून डिवचलं जात आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांकडून एकजूट बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचं नेतृत्व शरद पवारांनी करावं, असं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी याबाबत मोठं भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“ते फोटो बीडचे नाही तर शिंदेंच्या वरळीतील सभेचे,” ठाकरे गटाने फोटो पाठवत भाजप अन् शिंदे गटाचं पितळ उघड पाडलं
पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी अजिबात नाही. आम्हाला या देशात स्थिर आणि विकासाला प्रोत्साहित करणारे नेतृत्व हवे आहे. उद्या जनतेने उत्तम प्रकारची साथ दिली, त्यातून असे नेतृत्व काढू. माझ्यासारख्याची जबाबदारी आहे की अशा नेत्यांना पुर्ण साथ देणे आणि मदत देणे. मी पुढची निवडणुकच लढवणार नाही, मग पंतप्रधान पदाचा संबंधच येत नाही. अस शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा…“रेडे कापण्यासाठी शिंदे गटाने पापुआ न्यु गिनीला जावे”, राऊतांचा शिंदे गटावर पुन्हा हल्लाबोल
त्याचबरोबर त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं कौतुक केलं आहे. राहूल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेचा जनमानसात झालेला परिणाम याचे एक उदाहरण आपल्याला कर्नाटकमध्ये पाहायला मिळाले. अशाप्रकारे लोक राहूल गांधी आणि त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांना शक्ती देतील याची मला खात्री आहे. असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी, राष्ट्रवादीचं आंदोलन, फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“..तर संजय राऊत अंडासेलमध्ये असते..” शिंदे गटाच्या आमदारानी व्यक्त केली शक्यता
हेही वाचा…आघाडीत आता भाऊ बंदकी…! कोण मोठा भाऊ, कोण लहान भाऊ, ? जागावाटपावरून संघर्ष सुरू ?
हेही वाचा…” आघाडीत आता राष्ट्रवादीचं मोठा भाऊ,..” अजित पवार अन् पृथ्वीराज चव्हाणांमध्ये रंगला कलगीतूरा
हेही वाचा…भाजपविरूद्ध आघाडीने रणशिंग फुंकलं..! ‘१६ जून’ आघाडीचा मोर्चा महापालिकेवर धडकणार