सोलापुर : गेल्या काही महिन्यांपासून उजनी धरणाच्या पाणी प्रश्नांवरून आंदोलने सुरू आहेत. मात्र यावर लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. त्यामुळे सर्व आमदारांना चर्चेसाठी आमंत्रण पत्रिका पाठवणार आहोत. जर आमदार आले नाहीत तर त्यांच्या घरासमोर दिवाळीतील सुतळी बॉम्ब लावून त्यांना जागं करण्याचं काम आम्हा करणार आहोत. असा इशारा पाणी बचाव समितीचे प्रमुख अतुल खुपसे यांनी उजनी धरणाऱ्या पाणी प्रश्नावरून दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा यापुढे महाराष्ट्रभरात चालणार : आमदार महेश लांडगे
इतकं करून देखील आमदारांच्या दारात बॅन्ड बाजा पाठवून त्यांना एका ठिकाणी चर्चेसाठी उजनी धरण पाणी बचाव समिती करणार आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणाचं पाणी चोरून नेण्याचा त्यांचा डाव आहे. उजनी धरणांचं अर्ध पाणी हे बारामतीला जात आहे. सोलापुर जिल्हात मोहिते पाटलांचं आणि शिंदे मामाचं यांच्यात भांडण लावण्याचं काम अजित पवारांनी केलं. त्या भांडण लावण्यामागे उजनी धरणाच्या पाण्यावर दरोडा टाकण्यासाठी होता. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“वेश्या व्यावसायाला प्रोफेशन म्हणून स्वीकारा”; अमृता फडणवीसांचं बुधवार पेठेत वक्तव्य
उजनी धरणाचं पाणी हे इंदापुर आणि बारामतीला पळवून नेण्याच काम सुरू आहे. त्यामुळे मागील काही दिवसात आपने देखील आक्रमक भुमिका घेतली होती. मात्र यावर पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे उजनी धरणाच्या पाण्यावरून गेल्या काही दिवसापासून राजकीय संघर्ष खुप पेटला आहे. त्यावर आता अजित पवार काय प्रतिक्रिया देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “शरद पवारांचं काम समुद्राएवढं विशाल, बच्चू कडूंनी त्यांचा अभ्यास करावा”
- “शरद पवारांचं काम समुद्राएवढं विशाल, बच्चू कडूंनी त्यांचा अभ्यास करावा”
- राऊतांनी यापुढे जरी सांगितलं की तुम्ही मतदान आघाडीला देऊ नका तरी आम्ही..; देवेंद्र भुयार
- “त्या गद्दारांच्या यादीत पहिलं नाव अब्दुल सत्तारांचं होतं”; सत्तरांना दानवेंचं जोरदार प्रत्युत्तर
- “राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार, हे माझं भाकीत खरं ठरताना दिसतंय”; सुजय विखे पाटील