मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाचं कौतुक शरद पवारांनी केले. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजून वळवण्यात भाजपला यश आले. असं शरद पवारांनी म्हटलं. त्यानंतर त्यावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू याबाबत भाष्य केले. आता त्यावर पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बच्चू कडू यांना टोला लगावला आहे.
“वेश्या व्यावसायाला प्रोफेशन म्हणून स्वीकारा”; अमृता फडणवीसांचं बुधवार पेठेत वक्तव्य
शरद पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दित केलेलं काम समुद्राएवढं विशाल आहे. बच्चू कडू यांनी त्याचा अभ्यास करावा, म्हणजे त्यांना पवार साहेब समजतील. नसेल तर जाऊन समुद्राची खोली मोजावी, तेवढंच किमान कर्तृत्व त्यांच्या नावे जमा होईल. असं म्हणत त्यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मी पुन्हा येईन म्हणत फडणवीस ह्यांची पावलं पडली अन् विरोधकांची गढी डगमगली”; सदाभाऊ खोत
दरम्यान, पवारांनी मुळात फडणवीस यांचे कौतुक केले असे नाही. समुद्राचाी खोली जशी मोजता येत नाही, तसे पवारांच्या मनात काय आहे, याचा थांगपत्ता लागू शकत नाही. सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्यांबळ नव्हते. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजून वळवण्यात भाजपला यश आले. हा चमत्कार मान्य करावा लागेल, असं बच्चू कडू म्हणाले होते.
“अनाजी पंतांनी काहीही केले तरी पुन्हा येता येणार नाही”; दिपाली सय्यदचा फडणवीसांना खोचक टोला
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्हीही उमेदवार निवडून आल्याने त्याचा खापर शिवसेनेकडून अपक्ष आमदारांवर फोडलं जात आहे. त्यावर आता अमरावतीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी संजय राऊत आणि शरद पवारांची भेट घेत नाराजी व्यक्त केली.
Read also:
- राऊतांनी यापुढे जरी सांगितलं की तुम्ही मतदान आघाडीला देऊ नका तरी आम्ही..; देवेंद्र भुयार
- “त्या गद्दारांच्या यादीत पहिलं नाव अब्दुल सत्तारांचं होतं”; सत्तरांना दानवेंचं जोरदार प्रत्युत्तर
- “राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार, हे माझं भाकीत खरं ठरताना दिसतंय”; सुजय विखे पाटील
- देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा यापुढे महाराष्ट्रभरात चालणार : आमदार महेश लांडगे
- संजय राऊत तुम्ही ज्यांचा स्वाभिमानी म्हणून उल्लेख करता, त्याच्या बुडावर लाथ घालून..;