मुंबई : महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचे आमदार सुखी आहेत. मात्र यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं फार मोठं नुकसान होत आहे. येणाऱ्या विधान परिषदेतही शिवसेनेची नामुष्की होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांंनी हे सगळं षडयंत्र वेळीच ओळखावे, असा सल्ला भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे.
“भाजपच्या विजयामुळे काहींचे चेहरे पडलेत, काही बावचाळलेत तर अनेक जण फिसाटले”; देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडीमध्ये जास्त नुकसान शिवसेनेचे होत आहे. गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून शिवसेनेला संपवण्याचं काम सुरू केलं जात आहे. शिवसेनेतील अनेक पदाधिकारी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून ते या पक्षात काम करीत आहेत. ही राजकीय खेळी अपक्षांवर दोष देण्यापेक्षा काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मताधिक्याकडे पाहिलं तर राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार हे माझं भाकीत खरं ठरताना दिसत आहे. असंही सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
“घोडेबाजारातील असतो तर अगोदरच विकलो गेलो असतो”; राऊतांना संजयमामांचं जोरदार प्रत्युत्तर
अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीत विजय संपादन केलं. या निवडणुकीत शिवसेनेचे नेते संजय पवार यांचा पराभव करत भाजपचे नेते धनंजय महाडिक विजयी झालेत. यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा मोठा हात आहे. भाजपकडून पियुष गोयल आणि अनिल बोंडे देखील विजयी झाले.
निवडणूक राज्यसभेची अन् चर्चा पुणे जिल्ह्यातील ‘या’ चार आमदारांची !
दरम्यान, गेली अडीच वर्ष झालं परंतु या सरकारने जनहिताचं एकही काम केलं नाही. जे काही महाराष्ट्रात नवनवीन गोष्टी घडत आहेत. ते फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे सुरू आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणीस यांनी इंधनावरील कर कपातीवरून देखील त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच येत्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप विजयी होईल. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सत्तेत येईल,अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा लावायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read also:
- देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा यापुढे महाराष्ट्रभरात चालणार : आमदार महेश लांडगे
- संजय राऊत तुम्ही ज्यांचा स्वाभिमानी म्हणून उल्लेख करता, त्याच्या बुडावर लाथ घालून..;
- “वेश्या व्यावसायाला प्रोफेशन म्हणून स्वीकारा”; अमृता फडणवीसांचं बुधवार पेठेत वक्तव्य
- “मी पुन्हा येईन म्हणत फडणवीस ह्यांची पावलं पडली अन् विरोधकांची गढी डगमगली”; सदाभाऊ खोत
- “अनाजी पंतांनी काहीही केले तरी पुन्हा येता येणार नाही”; दिपाली सय्यदचा फडणवीसांना खोचक टोला