मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे तिन्हीही उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झालेत. आघाडीतील काही मतांवर भाजपने आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी रात्री उशिरा सुरू झाली आणि पहाटे निवडणुकीचा निकाल लागला. यात अनिल बोंडे, पियूष गोयल आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला तर कोल्हापुरचे आणि शिवसेनेचे नेते संजय पवार यांचा पराभव झाला. याच पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“केंद्रीय यंत्रणा तुमच्या कामी आल्या, 2024 ला हा हिशोब चुकता करू”; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा
मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या हातून सत्ता गेल्यानंतर मी पुन्हा येईन, हे वाक्य देवेंद्र फडणवीस यांचं खुप गाजलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाकडून जोरदार टिका कऱण्यात आली होती. याचाच आधार घेत राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत म्हणाले की, मी पुन्हा येईन म्हणत फडणवीस ह्यांची पावलं पडली अन् विरोधकांची गढी डगमगली. असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
“चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरचा पैलवानच वाढदिवसानिमित्ताने भेट दिला”; देवेंद्र फडणवीस
राज्यसभेची निवडणुक झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. मागच्या वेळी सदाभाऊ खोत यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र यावेळी त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे आता पुढच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार त्याकडे लक्ष आहे.
“लक्ष्मण जगताप यांनी दाखविलेली आश्वासक मुद्रा कधीच विसरू शकणार नाही”; देवेंद्र फडणवीस
दरम्यान, गेली अडीच वर्ष झालं परंतु या सरकारने जनहिताचं एकही काम केलं नाही. जे काही महाराष्ट्रात नवनवीन गोष्टी घडत आहेत. ते फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे सुरू आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणीस यांनी इंधनावरील कर कपातीवरून देखील त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच येत्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप विजयी होईल. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सत्तेत येईल,अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा लावायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असंही ते म्हणाले.
Read also:
- “अनाजी पंतांनी काहीही केले तरी पुन्हा येता येणार नाही”; दिपाली सय्यदचा फडणवीसांना खोचक टोला
- “भाजपच्या विजयामुळे काहींचे चेहरे पडलेत, काही बावचाळलेत तर अनेक जण फिसाटले”; देवेंद्र फडणवीस
- “कोण फुटलं, का फुटलं.? आज ना उद्या ते कळेल”; राऊतांच्या आरोपांवर भोंडेंचं समर्थन
- “घोडेबाजारातील असतो तर अगोदरच विकलो गेलो असतो”; राऊतांना संजयमामांचं जोरदार प्रत्युत्तर
- निवडणूक राज्यसभेची अन् चर्चा पुणे जिल्ह्यातील ‘या’ चार आमदारांची !