मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजप आमदार संतोष दानवे हे आमच्यासोबत असल्याचा दावा महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला होता. त्यावर सहाव्या जागेवर झालेल्या शिवसेनेच्या पराभवानंतर संतोष दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्याचबरोबर गद्दारांच्या यादीत पहिलं नाव अब्दुल सत्तारांचं होतं. त्यांनी आम्हाला केलेल्या मदतीमुळे त्यांचे आभार मानतो असा खोचक टोला दानवे यांनी सत्तारांना लगावला आहे.
“अनाजी पंतांनी काहीही केले तरी पुन्हा येता येणार नाही”; दिपाली सय्यदचा फडणवीसांना खोचक टोला
अब्दुल सत्तार ज्या पक्षात आहेत ते त्या पक्षात कधीच नसतात, म्हणून जे अपक्ष आमदार असतील त्यांना आमच्यासोबत घेण्यासाठी सत्तार यांनी जी मदत केली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यामुळे आपण ज्या पक्षात असतो. त्यांचासबोत कधीच नसतो हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. सत्तार यांचे तोंडच असें आहे की, ते बाजारात फिरतात.
“भाजपच्या विजयामुळे काहींचे चेहरे पडलेत, काही बावचाळलेत तर अनेक जण फिसाटले”; देवेंद्र फडणवीस
कोण कुठे गेलं. कुणाचे काय चाललं. अशा बडबडीमुळे आम्हाला मदत मिळत असते. त्यामुळे अशा प्रकारे त्यांनी आम्हाला मदत केली, अशीच मदत त्यांनी विधानपरिषदेच्या वेळी सुद्धा करावी, असा टोला देखील त्यांना लगावला.
“घोडेबाजारातील असतो तर अगोदरच विकलो गेलो असतो”; राऊतांना संजयमामांचं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, गेली अडीच वर्ष झालं परंतु या सरकारने जनहिताचं एकही काम केलं नाही. जे काही महाराष्ट्रात नवनवीन गोष्टी घडत आहेत. ते फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे सुरू आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणीस यांनी इंधनावरील कर कपातीवरून देखील त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच येत्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप विजयी होईल. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सत्तेत येईल,अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा लावायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read also:
- “राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार, हे माझं भाकीत खरं ठरताना दिसतंय”; सुजय विखे पाटील
- देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा यापुढे महाराष्ट्रभरात चालणार : आमदार महेश लांडगे
- संजय राऊत तुम्ही ज्यांचा स्वाभिमानी म्हणून उल्लेख करता, त्याच्या बुडावर लाथ घालून..;
- “वेश्या व्यावसायाला प्रोफेशन म्हणून स्वीकारा”; अमृता फडणवीसांचं बुधवार पेठेत वक्तव्य
- “मी पुन्हा येईन म्हणत फडणवीस ह्यांची पावलं पडली अन् विरोधकांची गढी डगमगली”; सदाभाऊ खोत