मुंबई : राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यापासून अनेक प्रकल्प महाराष्ट्रा बाहेर जाताना दिसत आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा इअरबस आणि आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन देखील महाराष्ट्राच्या हातून गेला आहे. त्यामुळे आता विरोधकांना एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. मात्र शिंदे याचा दोष महाविकास आघाडीला दिला आहे.
“फडणवीस काल म्हणाले की, द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे, अन् आज आव्हाडांना अटक”
केंद्र सरकारकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्यासाठी आठ राज्यांच्या प्रस्ताव मागितला होता. केंद्र सरकारने आठ राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांचे एका एजन्सीमार्फत मुल्यमापन केले. मात्र यामध्ये मध्य प्रदेशच्या औद्योगिक विकास महामंडळाने बाजी मारली आहे. त्यामुळे यामधून आपोआप महाराष्ट्र राज्याची पिछेहाट करण्यात आली.
“आव्हाडांना अटक करून मोगली सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला”
केंद्र सरकारने या प्रस्तावासाठी सुकाणु समितीने 22 ऑक्टोबर 2022 रोजी मंजूरी दिली आणि 2 नोव्हेंबर 2022 रोजी या प्रकल्पाबाबत मध्य प्रदेशच्या मुख्य सचिवांना केंद्र सरकारने प्रकल्प मंजूरीचे पत्र दिले. यामध्ये आंध्रप्रदेश, बिहार, गुजरात, मध्यप्रदेश, ओडीशा, तामिळनाडू आणि तेलंगणा या आठ राज्यांनी प्रस्ताव पाठवला होता.
“आव्हाड साहेबांची कोणतीही चुक नाही, त्यांनीच मला बाहेर काढलं”; मारहाण केलेल्या तरूणाचं स्पष्टीकरण
दरम्यान, ऊर्जा उपकरण निर्मितीसाठी 400 कोटींचे अनुदान या झोन निर्मितीसाठी केंद्र सरकार 400 कोटी रूपयांचे अनुदान देणार आहे. यापुर्वीच्या महाराष्ट्राच्या हातून गेलेल्या बल्क ड्रग पार्कसाठी 1 हजार कोटी, तर मेडिकल डिव्हाईस पार्कसाठी 400 कोटी रूपये केंद्राकडून मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हातून प्रकल्प गेल्याने काॅंग्रेसने सरकारवर टिका केली आहे. मी आधीही म्हणालो आहे. आता पुन्हा सांगतो. जोपर्यंत भाजप राज्याच्या सत्तेवर आहे. तोपर्यंत महाराष्ट्राची पिछेहाट होत राहिल. हे भाजपचे डबल इंजिनचे सरकार डबल स्पीडने महाराष्ट्राला मागे ओढत आहे. अशी टिका काॅंग्रेसचे नेेते सचिन सावंत यांनी केली आहे.
Read also
- “राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहु शकत नाही, अनेक नेते भाजप अन् शिंदे गटात येणार”
- किर्तीकरांनी पक्ष सोडला, राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले, “उद्यापासून लोक त्यांनाही…”;
- “आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात”; राष्ट्रवादीच्या माजी आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य
- मग आता प्रश्न विचारल्यावर मिरच्या का झोंबतायत ? काॅंग्रेसचा तिखट सवाल
- “राष्ट्रवादीची साथ सोडा सांगून कंटाळलो, अन् निर्णय घेतला”; किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश