मुंबई : मागील काही राजकीय घटनांवरून काॅंग्रेसमधील राजकीय वाद चव्हाट्यावर आले आहेत. यातच भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबत भाष्य केलं होतं. त्यावर आता अशोक चव्हाण यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…चंद्रकांतदादांनी घेतली बाळासाहेब दाभेकारांची भेट; मविआची डोकेदुखी वाढणार ?
अशोक चव्हाण सध्या ज्या पक्षात आहेत. त्या काॅंग्रेस पक्षाचं भविष्य काय आहे? नाशिक पदवीधर मतदारसंघात व्यक्तिगत अजेंड्यावर निवडणुक जिंकली. तिथे पक्षाचा कुठेही विचार झाला नाही. पक्षाचा विचार करण्यासाठी काॅंग्रेसमध्ये कुणालाही वेळ नाही. मला वाटतं की अशोक चव्हाण हे एक सक्षम नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदावर काम केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व संपुर्ण जगाने स्वीकारलं आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सर्वांनाच आवडेल. अशोक चव्हाण यांनी याबाबत विचार केला पाहिजे. असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..स्पर्श घोटाळ्यातील वादी-प्रतिवादी राष्ट्रवादीत; योगेश बहल यांची घुसमट!
त्यावर अशोक चव्हाण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. असा कोणताही विचार किंवा निर्णय घेतला नाही. अनेकवेळा यावरती भाष्य केलं आहे. ते माझे मित्र आहेत की शत्रू हाच प्रश्न निर्माण होतो. काॅंग्रेसमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का ?हीच शंका यातून येत आहे. त्यांचा सल्ला अमान्य आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा…“मुक्ताताईंएवढचं प्रेम हेमंत रासने यांनाही मिळेल, याची खात्री”, चंद्रकांत पाटील
- हेही वाचा..“भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले”, राष्ट्रवादीची टिकात्मक पोस्ट
- हेही वाचा..‘मास्टर ब्लास्टर’ आमदार सुनील शेळके चिंचवडमध्ये ठरणार ‘किंगमेकर’
- हेही वाचा..चंद्रकांतदादांनी घेतली बाळासाहेब दाभेकारांची भेट; मविआची डोकेदुखी वाढणार ?
- हेही वाचा..‘भाजयुमो’चे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या रविवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर..! शहराध्यक्ष महेश लांडगे, युवा मोर्चाचे संकेत चोंधे यांचा पुढाकार