बुलढाणा : मागील महिन्यात ‘प्रश्नम’ संस्थेने जाहीर केलेल्या त्रैमासिक अहवालात, देशातील १३ राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले असल्याचा निष्कर्ष समोर आला. ४९ % मतदारांनी उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचं मत नोंदवलं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडी यांच्यात यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यावरून आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी, महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
देशमुखांवर अटकेची टांगती तलवार! ईडीकडून केली गेली पुन्हा मोठी कारवाई
“महामारी काळात १४ महिने मंत्रालयात पाऊलही न ठेवणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा?” असा खडा सवाल त्यांनी उपस्थित करत, “उद्धव ठाकरेंना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणवणारा सर्व्हे नेमका कुणी केला हे माहिती नाही. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, त्यांनी विकासाची कामे केली. त्यामुळे राज्यातील १२ कोटी जनतेला विचारा, उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण आहे,” असं म्हणत, अप्रत्यक्षपणे फडणवीसच उत्कृष्ट मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी बुलडाण्यात पत्रकार परिषदेवेळी माध्यमांसमोर सांगितले.
महाविकास आघाडी सरकार म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे – देवेंद्र फडणवीस
दरम्यान, ‘प्रश्नम’ संस्थेकडून देशातील १३ राज्ये निवडण्यात आली होती. यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. या १३ राज्यांत, देशातील एकूण लोकसंख्येच्या ६७ % लोक राहतात.
“भुजबळ संपल्यात जमा; मुख्यमंत्र्यांना कायमचंच घरी बसवू,” नारायण राणेंचा हल्लाबोल
तसेच, या सर्वेक्षणात नुकत्यात विधानसभा निवडणुका पार पडलेल्या तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसामचा समावेश नाही, तर आंध्र प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत पॅनेल नसल्यामुळे या राज्यांचाही सर्वेक्षणात समावेश करण्यात आलेला नसल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं आहे.
Read Also :
- छगन भुजबळ अचानक दिल्लीला रवाना; देशातील बड्या वकीलाची घेणार भेट
- देगलूर पोटनिवडणुकीची मोर्चेबांधणी : काँग्रेसच्या बैठकीला अर्धाडझन मंत्र्यांची उपस्थिती
- नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आणि त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं – शिवसेना
- म्हाडाचे मंत्री तळियेत फिरकलेच नाहीत! शिवसेना आमदाराचे आव्हाडांना खडेबोल
- “सामनाचे नाव बदलून आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे,” भाजपचा घणाघात