रायगड : तळीये गावात, अतिवृष्टीने डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत, एकूण ८६ जणांचा मृत्यू झाला, तर ३२ घरे जमीनदोस्त झाली. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना, तसेच ज्यांची घरे जमीनदोस्त झाली, अशा सर्वांचे पुनर्वसन करून, त्यांना पक्की घरे बांधून देण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून म्हाडातर्फे देण्यात आलं. मात्र स्थानिक शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांनी, राज्य सरकारला घरचा आहेर दिला असून, म्हाडावर टीका करत त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर आरोप केले आहेत.
“सामनाचे नाव बदलून आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे,” भाजपचा घणाघात
“लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि मग आम्ही ठरवू! आम्हाला घरे हवी आहेत. नको अशातला भाग नाहीये, पण राज्य सरकार घरे देणार आहे, ती एकदाच देणार आहे. त्यामुळे ती देताना सरकारने स्थानिकांना विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार कार्याला हवा की आमचं घर कसं असावं,” असं म्हणत, “तळियेत म्हाडाचे मंत्री फिरकलेच नाहीत! त्यांनी परस्पर छोटी घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ती स्वीकारणार नाही,” असा इशारा दिला आहे.
मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर ‘बुलडोझर’, आता पुढे परब? सोमैय्या म्हणतात, “करून दाखवले!”
दरम्यान, शासनाच्या या परस्पर घेतलेल्या निर्णयाला आपत्तीग्रस्तांनी देखील विरोध केला असून, इतक्या ३०० चौरस फुटांची लहान घरे काय उपयोगाची? आमच्या गरजेइतक्या क्षेत्रफळाची घरे आम्हाला मिळावीत, असे आव्हान त्यांनी स्थानिक आमदारांच्यातर्फे केलं आहे. या पार्श्वभूमीवर गोगावले यांनीही शासनाकडे या मागणीसाठी आग्रह धरणार असल्याचे आश्वासन आपत्तीग्रस्तांना दिले आहे.
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र! बाळासाहेब थोरातांचे मोठे विधान
त्यामुळे, म्हाडाच्या पुनर्वसनावरती आता महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या स्थानिक आमदारानेच नाराजी व्यक्त केली असून, खडेबोल सुनावले असल्याने, आघाडीत यावरून बिघाडी होईल का?अशी शंका आता घेतली जात आहे. तसेच, यातून नेत्यांचा भोंगळ कारभार देखील समोर आला आहे. त्यामुळे, आता मंत्री भेट देऊन पाहणी करणार का? आपत्तीग्रस्तांना विश्वासात घेऊन, त्यांच्या मागणीची घरे त्यांना देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Read Also :
- शिवसेनेत घुसमट? नारायण राणेंच्या गौप्यस्फोटवर, एकनाथ शिंदे म्हणतात…
- आमदार निलेश लंकेंवर केलेल्या गंभीर आरोपावर सुप्रिया सुळे म्हणातात…
- “उपमुख्यमंत्री अजित पवार हवी तशी साथ देत नाहीत,” यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
- महिला तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणात अण्णा हजारेंनी घेतली उडी; काय म्हणाले नेमकं…
- परमबीर सिंग-वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९ लाख वसूल केले, बारमालकाचे गंभीर आरोप