मुंबई : नारायण राणे ‘जन आशीर्वाद’ यात्रेच्या दरम्यान सातत्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीवर हल्लबोल करत असून, त्यांनी वसईत प्रसारमाध्यमांशी बोलताना, “एकनाथ शिंदे मातोश्रीच्या आदेशाशिवाय एकही सही करु शकत नाहीत. ते केवळ सही पुरतेच मंत्री असून, शिवसेनेला कंटाळले आहेत. त्यांना लवकर आमच्यात घेऊ. मी त्यांना फोन करणार आहे, ते आले तर स्वागतच,” असा गौप्यस्फोट करत, ” मनात आणले तर ठाकरे सरकारचं विसर्जन करु,” असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळलेत, त्यांना आमच्यात घेऊ”; राणेंचा मोठा गौप्यस्फोट
दरम्यान, यावर आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी, “मला कामाचं स्वातंत्र्य नाही. माझ्या विभागाचा कारभार मातोश्रीवरून चालतो, हा शोध त्यांनी कुठून लावला ते माहीती नाही. मला काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. मी अनेक प्रलंबित प्रश्न मंत्री म्हणून सोडवले आहेत. मी पक्षात समाधानी आहे. त्यांच्या विधानात कोणतंही तथ्य नाही. त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. मातोश्रीतून माझ्या कामात कोणताही हस्तक्षेप केला जात नाही. स्वातंत्र्य नसतं, तर मी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकलोच नसतो,” असं त्यांनी सांगितलं.
आमदार निलेश लंकेंवर केलेल्या गंभीर आरोपावर सुप्रिया सुळे म्हणातात…
तसेच, “नारायण राणेंनी केलेलं वक्तव्य संभ्रम निर्माण करणारे असून, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून अशाप्रकारची वक्तव्य निर्माण करून, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे,” असाही आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, नारायण राणेंनी वसई-विरार इथे प्रसार माध्यमांशी बोलताना, “आम्ही गर्दी वाढवत नाही, गाडी भरून माणसं आणत नाही. यात्रेला लोक स्वतःहून गर्दी करत आहेत. नाहीतर काही लोकांना बघून ते तोंड फिरवतात,” असा हल्लबोल मुख्यमंत्र्यांवर केला.
“उपमुख्यमंत्री अजित पवार हवी तशी साथ देत नाहीत,” यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
यावेळी त्यांनी नीलम गोऱ्हेंचा समाचार घेताना, “माझ्यावर टीका केली तर मंत्रिपदं मिळतात. आमदार नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेतं आणलं. त्यांच्या आमदारकीसाठी मी प्रयत्न केले. आता पहा त्यांची त्यांच्याच पक्षात किती फरफट होत आहे,” असा टोला लगावला, तर राष्ट्रवादीवर केलेल्या राज ठाकररेंच्या विधानावर, “राज ठाकरे जे बोलले ते अगदी बरोबर बोलले. मी त्यांचा मुद्दा खोडत नाही,” असं सांगत, “उद्या मनसे-भाजपची युती झाली तर आनंद आहे,” असं विधान केलं.
Read Also :
- परमबीर सिंग-वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९ लाख वसूल केले, बारमालकाचे गंभीर आरोप
- “एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळलेत, त्यांना आमच्यात घेऊ”; राणेंचा मोठा गौप्यस्फोट
- राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला, भाजपकडून पहिल्यांदाच दिली गेली प्रतिक्रिया
- तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल”, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
- उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना सांगितली ‘मनातली गोष्ट’! राऊतांचा गौप्यस्फोट