मुंबई : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल विरोधी पक्षनेत्यांशी संवाद साधला. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील दृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तेव्हा उद्धव ठाकरेंनी, “आत्ता खुर्ची दिसत नाही, तरीही आपण एकत्र आहोत. जेव्हा खुर्ची प्रत्यक्षात दिसेल, तेव्हा देखील आपण एकत्रचं राहिलं पाहिजे, असं त्यांनी सोनिया गांधींना सांगितलं,” असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
रोहित पवारांनी राज ठाकरेंचे ‘कौतुक’ करत काढला भाजपला चिमटा, म्हणाले…
संजय राऊत आज प्रसार माध्यमांशी बोलत होते. “विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. सोनिया गांधींच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर राज्यातील नेते, तसेच मुख्यमंत्री देखील सहभागी झाले होते. यावेळी, उद्धव ठाकरेंनी, “आपण आत्ता एक आहोत, पण जेव्हा खुर्ची दिसेल, तेव्हाही आपण एकत्रच राहू, हा विश्वास आपण लोकांमध्ये निर्माण केला पाहिजे,” असं मुख्यमंत्री बोलले असं त्यांनी सांगितलं.
भाजपच्या ‘जन आशिर्वाद’ यात्रेची पोलखोल करणार; राष्ट्रवादीने दंड थोपटले
तसेच, “या बैठकीत लोकशाही, महागाई आणि देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती. विरोधकांकडून हे एक महत्त्वाचं पाऊल आहे,” असं त्यांनी सांगितलं. यावेळी, फडणवीसांनी तालिबानबाबत विधान केलं होतं. त्यावर, “जेव्हा बाबरी पाडली, तेव्हा सगळे पळून गेले होते. ९२ च्या मुंबई हल्ल्यात देखील शिवसेना पुढे होती. तेव्हा हे कुठे गेले होते?,” असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला.
“भाजपाचं म्हणजे, मी नाही त्यातली आणि…”, पिंपरी-चिंचवड पालिका भ्रष्टाचारावरून शिवसेनेचा खोचक टोला!
“शिवसेना प्रखर आहे, हे मोदींनाही माहिती आहे. बाबरीच्या वेळी शिवसेनेवर बोट दाखवलं गेलं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी पुढाकार घेतला. त्याग आणि बलिदान केले. मुंबईतल्या दंगलीतही रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी दंगेखोरांनाचा सामना केला होता. तेव्हा जे कडी-कुलूप लावून आत बसले होते, ते आज आम्हाला तालिबानी म्हणत आहेत,” असा भाजपवर हल्ला चढवत, “प्रत्येक वेळी मराठी माणसावर अन्याय होईल, तेव्हा शिवसेना त्यागासाठी, बलिदानासाठी तत्पर असेल,” असं विधान त्यांनी केलं.
Read Also :
- न्यायासाठी संजीवनी काळेंनी ठोठावले ‘कृष्णकुंज’चे दरवाजे, घेतली शर्मिला ठाकरेंची भेट!
- लाच प्रकरण: सभापती नितीन लांडगे यांचा जामीन फेटाळला; राष्ट्रवादीचे ४ अन् शिवसेनेच्या २ नगरसेवकांची होणार चौकशी!
- …अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: कचरा उचलला; काय झालं नेमकं…!
- भाजपची जन आशीर्वाद यात्रा वादाच्या भोवऱ्यात; मुंबई पोलिसांकडून तब्बल ३६ गुन्हे दाखल
- लायकी नसलेल्या दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंबद्दल बोलू नये – मनसे