पुणे : राज ठाकरेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, राष्ट्रवादीवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपावरून राष्ट्रवादी-मनसे मध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच काल पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा, “राष्ट्रवादीच्या जन्माननंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष वाढला. हे सर्वांना माहिती होतं. बोललो फक्त मी,” असा चिमटा काढला. दरम्यान या वादात आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी उडी घेतली असून, त्यांनी २ ट्विट करून यावर भाष्य केले आहे.
मी प्रबोधनकार पण वाचलेत आणि यशवंतराव पण – राज ठाकरे
“राज ठाकरे साहेब हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडिओ…’ च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो.” असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांचे कौतुक करत भाजपवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 21, 2021
रोहित पवारांच्या पुढाकाराने खर्डा किल्ल्यावर फडकावला जाणार देशातील सर्वात उंच भगवा ध्वज
तसेच, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय!” असं लिहीत नाव न घेता भाजपवर टीका केली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंवर या आधी टीका केली गेली आहे.
अजित पवार यांनी, “कधी तरी काही लोक असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं करण नाही,” अशा शब्दात राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे, तर शरद पवारांनी, “राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी आधी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं. तेच त्यांना योग्य रस्ता दाखवेल,” असा खोचक टोला लगावला आहे. तसेच, राज ठाकरेंनी वाचन वाढवायला हवं. राष्ट्रवादी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. राज ठाकरेंचा जातीव्यवस्थेचा अभ्यास नसावा,” असा हल्लाबोल मलिक यांनी केला आहे.
Read Also :
- भाजपच्या ‘जन आशिर्वाद’ यात्रेची पोलखोल करणार; राष्ट्रवादीने दंड थोपटले
- …अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: कचरा उचलला; काय झालं नेमकं…!
- पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय दबावतंत्र : भाजपा-राष्ट्रवादीत सत्तेसाठी ‘महाभारत’; स्थानिक एकवटणार
- लाच प्रकरण: सभापती नितीन लांडगे यांचा जामीन फेटाळला; राष्ट्रवादीचे ४ अन् शिवसेनेच्या २ नगरसेवकांची होणार चौकशी!
- “पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही”, मोदी मंदिरावरून उपमुख्यमंत्र्यांचा शाब्दिक टोला