मुंबई : भाजपचा राज्यभरात वेगाने धावत असेलला ‘जन आशीर्वाद’ यात्रेचा रथ रोखण्यासाठी, आता राष्ट्रवादी काँग्रेसने दंड थोपाटले असून, या यात्रेची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते विविध जिल्ह्यांत रोज पत्रकार परिषदा घेऊन भाजपवर हल्लाबोल करत, त्यांची पोलखोल करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली.
“राणे कुणाच्या धमक्यांना घाबत नाहीत, ते सेनेला जशास तसे उत्तर देतील”, कराडांचा इशारा
“केंद्रातील मोदी सरकार सगळ्याच आघाडींवर अपयशी ठरले आहे. मात्र, भाजपकडून ‘जन आशिर्वाद यात्रा काढली जात आहे. त्यामुळे, वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल-गॅसची दरवाढ, महामारी काळात आलेले अपयश, पेगॅससच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केलेली हेरगिरी, तीन कृषी कायदे यांचा ऊहापोह या पत्रकार परिषदेतुन केला जाणार आहे. ओबीसी-मराठा आरक्षणाला घेऊन, केंद्र सरकार कशी चालढकल करत आहे, हे देखील याद्वारे जनतेसमोर उलघडण्यात येणार आहे.
शिवसेनेच्या कृतीची फडणवीसांनी केली तालिबानशी तुलना, म्हणाले…
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आज सं. ५ वा. वसईत, तर जयदेव गायकवाड औरंगाबादमध्ये सं. ५ वा. पत्रकार परिषद घेणार असून, २३ ऑगस्टला सं. ४ वा. राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे हे अलिबाग इथे, २४ ऑगस्टला संजय तटकरे रत्नागिरमध्ये आणि कणकवली येथे प्रवक्ते अंकुश काकडे हे, सं. ५ वा. पत्रकार परिषद घेणार आहेत.
‘आधी केलेले पाप धुवा, मगच आशीर्वाद मागा!’ राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादीची टीका
भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘जन आशीर्वाद’ यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेदरम्यान भाजप नेते जनतेमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती पोहचवणार असून, यातून इतरही काही गोष्टी भाजप साध्य करणार आहे. दुसरीकडे, या यात्रेवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.
Read Also :
- न्यायासाठी संजीवनी काळेंनी ठोठावले ‘कृष्णकुंज’चे दरवाजे, घेतली शर्मिला ठाकरेंची भेट!
- लाच प्रकरण: सभापती नितीन लांडगे यांचा जामीन फेटाळला; राष्ट्रवादीचे ४ अन् शिवसेनेच्या २ नगरसेवकांची होणार चौकशी!
- …अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: कचरा उचलला; काय झालं नेमकं…!
- भाजपची जन आशीर्वाद यात्रा वादाच्या भोवऱ्यात; मुंबई पोलिसांकडून तब्बल ३६ गुन्हे दाखल
- लायकी नसलेल्या दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंबद्दल बोलू नये – मनसे