मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, भाजपच्या ‘जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात दि. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन केली. यानंतर काही स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी या स्मृतीस्थळाचं गोमूत्र शिंपडून आणि बाळासाहेबांच्या फ्रेमला दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केलं. त्यामुळे, आता यावरून भाजप-शिवसेनेमध्ये संघर्षाला तोंड फुटले आहे.
‘आधी केलेले पाप धुवा, मगच आशीर्वाद मागा!’ राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादीची टीका
दरम्यान, शिवसैनिकांच्या या कृतीचा राणेंनी समाचार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. यांनतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही निशाणा साधला असून, “ज्यांनी हे कृत्य केलं, त्यांना बाळासाहेबांची शिवसेनाच समजली नाहीये. ही एकप्रकारची संकुचित मानसिकता आहे. हा बुरसटलेला तालिबानी विचार आहे. हे वागणं अयोग्य आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही”, अशा परखड शब्दांतर त्यांनी आपला निषेध व्यक्त केला आहे.
“माझ्या काही वाचनात आलं नाही, तो अतिशय स्थानिक प्रश्न”; संजय राऊतांची राणेंना टोलेबाजी
“ज्यांनी बाळासाहेबांना तुरुंगात घालण्याचा प्रयत्न केला, आज तुम्ही त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्तेत बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेऊन, त्यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घ्यायला कुणी जात असेल, तर मात्र ती समाधी अपवित्र झाली असं सांगता. ही कृतीच अतिशय अयोग्य आहे”, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यानराणेंनी देखील पत्रकार परिषदेतून यावर शरसंधान साधले.
बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पुत्र असतो तर त्यांना इथे येऊच दिलं नसतं – नारायण राणे
“गोमूत्र ज्यांना शिंपडायचंय त्यांना शिंपडू द्या. एवढा जर स्मारकाचा अभिमान असेल, तर दलदलीतलं ते स्मारक पहा! राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत. त्यामुळे, जे गोमूत्र शिंपडायला आले, त्यांनी जागतिक किर्तीचं स्मारक करण्याचा प्रयत्न करावा. गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा, आधी स्वतःची मनं शुद्धीकरण करा! मग राज्याचा कारभार करा,” असा हल्ला त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर चढवला.
Read Also :
- भाजप नेते किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर वाशिममध्ये दगडफेक; शिवसैनिकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
- गोपीचंद पडळकरांचा पोलिसांना गुंगारा; भल्या पहाटे भरवली बैलगाडा शर्यत
- “…तेव्हाच मी ईडीच्या चौकशीला सामोरे जाईन,” अनिल देशमुखांनी दिलं पहिल्यांदाच थेट उत्तर
- “आम्हाला फक्त ब्रह्मज्ञान आणि त्यांच्याकरता कोरडे पाषाण”, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- राज्यात महाविकास आघाडीमुळे भाजपाला विस्ताराची मोठी संधी’; देवेंद्र फडणवीसांचा दावा