मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यांनतर महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा बसला आहे. दोन ते तीन दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहे. अशातच आता आसाम काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेने बोराह यांनी एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांना पत्र लिहिले आहे.
सगळं ठरलंय, फडणवीस मुख्यमंत्री, अन् शिंदे साहेब उपमुख्यमंत्री; बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
सध्या आसाममध्ये पुराची परिस्थिती गंभीर झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील सर्व आमदार गुवाहाटी येथे असल्याने पोलीस प्रशासन सर्व त्यांच्या सुरक्षतेसाठी तैनात करण्यात आले आहे. मात्र पुरग्रस्त लोकांना वाचवण्यासाठी पुरेसं पोलीस बळ सर्व आमदारांना सुरक्षा देण्यासाठी हॉटेल च्या परिसरात तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे आपण आसाम सोडून महाराष्ट्रात जावे, अशी विनंती भुपेन कुमार बोराह यांनी पत्रात म्हटलं आहे.
“गुवाहाटीत रूसलेले शिवसेनेचे आमदार उद्या मुंबईत दाखल होतील” जयंत पाटील
त्याआधी आसाम मध्ये काल तृणमुल काॅंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळे की काय आता एकनाथ शिंदे यांचा गट आता गुवाहाटी देखील सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सुरूवातीला सुरत त्यानंतर गुवाहाटी आता कुठे जाणार ?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
“बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात असेल असं मला वाटत नाही”; अजित पवार
दरम्यान, शिवसेनेतील पडलेल्या फुटीमुळे महाविकास आघाडीतील मंत्रीही चिंताक्रातं झाले आहेत. त्यामुळे प्रस्तावांच्या फाईल क्लिअर करण्याच्या कामाला वेग आला आहे. तसेच मंत्री कार्यालयांतही धावपळ वाढली आहे. त्याचवेळी मंत्री कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही पुन्हा मुळ विभागात जावे लागू शकते म्हणुन चिंता वाढली आहे. तसेच काही विभागात तर कर्मचारी कित्येक तास थांबून फाईल्स क्लेअर करण्याचे काम करीत आहेत. तसेच मंत्रालयातील गर्दीत दिवसागणिक मोठी वाढ होत असल्याने मंत्रालयातील अनेक विभागांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
Read also:
- आसाममध्ये भयंकर पूर असतानाही त्यांची ‘महाशक्ती’ मात्र बंडखोरांना सांभाळण्यातच व्यस्त
- बंड मोडण्यासाठी शरद पवार मैदानात उतरल्यानंतर भाजपची मोठी खेळी; थेट राज्यपालांना पत्र
- “नीट शेतीची काळजी घेतली असती तर हातातलं पीक कोणी घेऊन गेलं नसतं “; राऊतांना भाजपचा टोला
- “राज्यात पेरण्या सुरु अन् कृषीमंत्री आसामच्या चिंतन शिबिरात, मुख्यमंत्री लक्ष द्या”, संजय राऊत
- “राज्यात पेरण्या सुरु अन् कृषीमंत्री आसामच्या चिंतन शिबिरात, मुख्यमंत्री लक्ष द्या”, संजय राऊत