मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार अजुनही सत्तेत असून शिवसेनेचे रूसून बसलेले आमदार उद्या सकाळा परत येतील. त्यामुळे राज्यातील सरकारला कोणाताही धोका नसून राष्ट्रवादी काॅंग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी कायम आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. तसेच राष्ट्रवादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याच अजित पवारांनी देखील स्पष्ट केलं आहे.
“उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे”; राष्ट्रवादीचा ठाकरेंना भक्कम पाठिंबा
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप होत आहे. यावर बोलताना जंयत पाटील म्हणाले की, यामध्ये भाजपचा कोणताही नेता त्यांच्याकडे गेला नसल्याचे तसेच तशा पद्धतीचं चित्र सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य नाही. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडे 41 आमदार असल्याचा दावा होत आहे. त्यामुळे हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
शिवसेनेत आतापर्यंत जो कोणी बंड करतो, त्याच्यासोबत नेते मंडळी जातात, मात्र शिवसैनिक हा तिथेच राहतो. त्याचबरोबर बंड करणारा नेता पुढच्या निवडणुकीत निवडून येत नाहीत. त्यासाठी शिवसैनिक मेहनत करीत आहेत. असा राजकारणातील माझा अनुभव असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच विकास निधीवर बोलताना प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक पक्षातील आमदाराला समान निधी देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आव्हानाला एकनाथ शिंदे गटाचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले..;
दरम्यान, बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हात असेल असं मला वाटत नाही. तसेच सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. त्यामुळे शेवटपर्यंत आम्ही महाविकास आघाडीला तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा शेवटपर्यंत असेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी भाष्य केलं.
Read also:
- “बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात असेल असं मला वाटत नाही”; अजित पवार
- सरकारमधून राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत; शरद पवारांच्या उपस्थित बैठक
- शिंदेंची समजुत काढायला गेलेले रविंद्र फाटकच दोन आमदारांना घेऊन गुवाहाटीत दाखल
- एकनाथ शिंदेंचं बंड अन् दोन दिवसातच आमदारांना 319 कोटींचा निधी वितरीत
- डबलढोलकी कैलास पाटलांनापासून पक्षप्रमुखांनी सावध रहावं; तानाजी सावंतांनी केली पोलखोल