मुंबई : राज्याच्या राजकीय परिस्थितीबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं आहे. जोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आहे, तोपर्यंत राष्ट्रवादी काॅंग्रेसचा पाठिंबा हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. तसेच विकास निधीवरून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर देखील अजित पवार यांनी स्पष्टिकरण दिलं आहे. आज राष्ट्रवादी काॅंग्रेसची बैठक पार पडली, त्यानंतर त्यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली.
राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यांच्याबाबत आम्ही बारीक लक्ष ठेऊन आहोत. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली तेव्हाच पाच वर्षाचं सरकार ठिकवणार असल्याचं ठरवलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चालणार असा विश्वास देखील अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार असं संजय राऊतांनीच म्हटलं होतं , असं म्हणत त्यांनी संजय राऊतांनाचा टोला लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आव्हानाला एकनाथ शिंदे गटाचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले..;
शिवसेनेत आतापर्यंत जो कोणी बंड करतो, त्याच्यासोबत नेते मंडळी जातात, मात्र शिवसैनिक हा तिथेच राहतो. त्याचबरोबर बंड करणारा नेता पुढच्या निवडणुकीत निवडून येत नाहीत. त्यासाठी शिवसैनिक मेहनत करीत आहेत. असा राजकारणातील माझा अनुभव असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच विकास निधीवर बोलताना प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक पक्षातील आमदाराला समान निधी देण्याचा प्रयत्न केला आहे.
शिंदे गटाचा आता थेट धनुष्यबाणावरच दावा; शिवसेना पक्षच एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात
दरम्यान, बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हात असेल असं मला वाटत नाही. तसेच सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. त्यामुळे शेवटपर्यंत आम्ही महाविकास आघाडीला तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा शेवटपर्यंत असेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी भाष्य केलं.
Read also:
- सरकारमधून राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत; शरद पवारांच्या उपस्थित बैठक
- शिंदेंची समजुत काढायला गेलेले रविंद्र फाटकच दोन आमदारांना घेऊन गुवाहाटीत दाखल
- एकनाथ शिंदेंचं बंड अन् दोन दिवसातच आमदारांना 319 कोटींचा निधी वितरीत
- डबलढोलकी कैलास पाटलांनापासून पक्षप्रमुखांनी सावध रहावं; तानाजी सावंतांनी केली पोलखोल
- “उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे”; राष्ट्रवादीचा ठाकरेंना भक्कम पाठिंबा