मुंबई : घुसखोर बांगलादेशींना भारतीय ओळखपत्रं बनवून देणाऱ्या टोळीचा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं (एटीएस) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एटीएसने आठ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून विविध सरकारी कार्यालयांचे बनावट रबराचे शिक्के, बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड जप्त करण्यात आले आहेत. एटीएसची ही मोठी कारवाई मानली जात आहे.
Maharashtra: Anti-Terrorism Squad (ATS) arrested 8 persons who were involved in making Indian identity cards for Bangladeshi illegal immigrants.
Forged rubber stamps that belonged to Government offices, forged PAN cards, Aadhaar cards have been recovered from their possession.
— ANI (@ANI) December 14, 2020
पोलिसांच्या माहितीनुसार, अक्रम शेख, मोहम्मद रफीक शेख, अविन केदारे, सोहेल अब्दुल सुभान शेख, अब्दुल खैर समसुलहक शेख, अबुल हाशम ऊर्फ म्हामून काशम शेख, इद्रिस मोहम्मद शेख, नितीन राजाराम निकम या आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रबरी शिक्के, महत्वाची कागपतत्रे, प्रिंटर्स, मोबाईल फोन, भारत सरकारचे कोर्ट फी स्टँप असा बनावट ओळपत्र बनवण्याच्या साहित्यांचा मोठा साठा जप्त केला आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे मोहम्मद रफीक, मोहम्मद इद्रीस, अवीन केदारे, नितीन निकम आठ जणांनी बनावट कादपत्रांच्या सहाय्याने सुमारे ८५ बांगलादेशी घुसखोरांना भारतीय पासपोर्ट मिळवून दिली. तसेच अनेक भारतीयांना देखील बनावट कागदपत्र्यांच्या आधारे पासपोर्ट मिळवून दिले आहेत. या बनावट ओळखपत्र निर्मिती प्रकरणात अक्रम शेख, सोहेल अब्दुल सुभान शेख, अब्दुल शेख, अबुल हाशम. अशा एकूण ४ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
Read Also :
जगभरात जीमेल, गुगल आणि युट्यूब का झालं होत झालं डाऊन?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित
‘रवी राणांचा पोशाख पाहून अध्यक्ष भडकले आणि त्यांना बाहेर काढले’
गोपीचंद पडळकर यांचं धनगरी वेष परिधान करुन ढोल वाजवत आंदोलन
… तर या शेतकऱ्यांशी चर्चा का करत आहात ? चिदंबरम यांचा मोदी सरकारला खोचक सवाल