मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यासह देशभरातील नेत्यांनी ट्विट करत त्यांना अभिवादन केले. मात्र सध्या शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधींनी मात्र एकही ट्विट केले नाही. यावरून भाजपकडून शिवसेनेवर निशाणा साधण्यात येत असून, राहुल गांधींनी अवघ्या शिवसेनेला जोड्याकडे का उभे केले आहे त्याचा विचार करावा?, असा सल्ला दिला आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सेनेवर बोचरी टिका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकार आणि भाजपवर सातत्याने टीका केली जाते. याचा देखील भातखळकरांनी समाचार घेतला.
सामनाने दुनियेला सल्ले देण्यापेक्षा राहुल गांधीनी अवघ्या शिवसेनेला जोड्याकडे का उभे केले आहे त्याचा विचार करावा? शिवसेनाप्रमुखांना जयंती दिनी अभिवादन न करणाऱ्या राहुल गांधीना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 25, 2021
सामनाने दुनियेला सल्ले देण्यापेक्षा राहुल गांधीनी अवघ्या शिवसेनेला जोड्याकडे का उभे केले आहे त्याचा विचार करावा?, असा सल्ला त्यांनी ट्विट करत शिवसेनेला दिला आहे.
शिवसेनाप्रमुखांना जयंती दिनी अभिवादन न करणाऱ्या राहुल गांधींना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर, अशी बोचरी टीका भातखळकरांनी केली.
Read Also :
- ‘या तथाकथित पर्यावरणप्रेमी कुटुंबियाने…’, अमृता फडणवीसांचा ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल
- मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे सायबर हल्ला ? गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण
- राष्ट्रवादीत पुन्हा घरवापसी ? शिवेंद्रराजेंसह अनेकजण पुन्हा परतण्याचे नवाब मलिकांकडून संकेत
- ‘महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली’, मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रपती पदक विजेत्यांचे अभिनंदन
- महाराष्ट्रातील या 6 व्यक्तींना प्रतिष्ठेचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर