मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियावर आरोप करत आहेत. सोमय्या यांनी पुन्हा एकदा ट्विट करत उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या वनजमिनीवर बंगला उभारल्याचा आरोप केला आहे.
सोमय्या उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील जाहीर केला आहे. कोर्लाई (अलिबाग) येथील या जमिनीचा काही भाग जंगलाच्या हद्दीत मोडतो. त्यामुळे याठिकाणी बंगला बांधताना ठाकरे परिवाराने परवानगी घेतलीच असेल, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
So the so called ‘environment’ loving family builds bungalow in forest land ? वाह वाह सरकार, अपनी ही कुल्हाड़ी से करे निसर्ग पर वार !! #mahavikrutaghadi https://t.co/SNk8pNWoko
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 25, 2021
सोमय्या यांच्या ट्विटनंतर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी देखील ठाकरे कुटुंबियावर निशाणा साधला आहे.
या तथाकथिक पर्यावरणप्रेमी कुटुंबियाने जंगलातील जमिनीवर बंगला बांधला आहे का? वाह वाह सरकार, अपनी ही कुल्हाडी से करे निसर्ग पर वार, अशा शब्दात अमृता फडणवीसांनी ठाकरे कुटुंबियावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
Read Also :
- मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे सायबर हल्ला ? गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण
- राष्ट्रवादीत पुन्हा घरवापसी ? शिवेंद्रराजेंसह अनेकजण पुन्हा परतण्याचे नवाब मलिकांकडून संकेत
- ‘महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली’, मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रपती पदक विजेत्यांचे अभिनंदन
- महाराष्ट्रातील या 6 व्यक्तींना प्रतिष्ठेचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर
- ‘जे महाराष्ट्रात घडले तेच पश्चिम बंगालमध्ये घडत आहे’, शिवसेनेचा केंद्रावर निशाणा