मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकारण चांगलेच तापले आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणादरम्यान ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने ममता दिदी नाराज झाल्या होत्या. यावर आता सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे.
शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ममता बोलायला उभ्या राहिल्या, तेव्हा ‘जय श्रीराम’चे नारे गर्दीने दिले. ममता बॅनर्जी यावर चिडल्या व हा आपला अपमान असल्याचे त्यांनी माईकवरूनच सांगितले. ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ बंगाल भाजपाने ओळखला आहे व निवडणुका होईपर्यंत ते अशा नाजूक विषयांवर मर्मभेद करीत राहतील. ‘जय श्रीराम’च्या नाऱयांवर ममता चिडू नयेत, या मताचे आम्ही आहोत. उलट त्यांच्या सुरात सूर मिसळला असता तर डाव समोरच्यांवरच उलटला असता, पण प्रत्येक जण आपल्या व्होट बँकेचीच पखाली वाहत असतो, असा सल्ला शिवसेनेने सामना अग्रलेखातून ममता बॅनर्जीना दिला आहे.
निवडणुकांत कोणीतरी जिंकेल व कोणीतरी हरणारच आहे. हिंदुस्थानी लोकशाही ‘ट्रम्प छाप’ नाही. कौल हा स्वीकारावाच लागतो. पण कौल आपल्या बाजूने वळावा, यासाठी जे अघोरी प्रयोग आपल्या लोकशाहीत केले जातात ते असह्य ठरतात. उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणेच प. बंगालात भाजपने धार्मिक फाळणी सुरू केली आहे. त्यास काही प्रमाणात ममता बॅनर्जी जबाबदार आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
तृणमूल काँग्रेस फोडायची, खिळखिळी करायची व तृणमूलचेच आमदार फोडून त्यांना भाजपची उमेदवारी द्यायची. 2014 साली महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक तालुका, जिह्यात याच पद्धतीने फोडून भाजपने त्यांना उमेदवाऱया दिल्या. त्यातले बरेच लोक निवडून आले. अशा तऱहेने भाजपने आपला आकडा फुगवला. जे महाराष्ट्रात घडले, तेच प. बंगालात घडताना दिसत आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे.
Read Also :
- मुंबई पालिका निवडणुकीसाठी एमआयएम देखील मैदानात, मोर्चेबांधणीसाठी ‘या’ राज्यातून आमदार येणार
- ‘100 कोटी म्हणजे काही गोळ्या-बिस्कीट नाही, जे यांना देतील’, पडळकरांचा शशिकांत शिंदेंवर निशाणा
- ‘मी पुन्हा येणार’ म्हणण्याची फडणवीसांची सवय ट्रम्पला लागली, अशोक चव्हाणांचा टोला
- आमच्या मुळावर येणाऱ्यांची जिरवल्याशिवाय राहणार नाही, वडेट्टीवारांचा इशारा
- … म्हणून शेतकऱ्याने थेट पंतप्रधान मोदींच्या आईलाच लिहिले पत्र