जालना : कोणाला काय द्यायचं, याच्याशी काहीही देणेघेणे नसून, आमच्या हक्काचे कोणी काढून घेत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाच्या मोर्चात बोलताना दिला. विजय वडेट्टीवार यांनी जालन्यात ओबीसी मोर्चात सहभागी नोंदवला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी अशी मागणी देखील केली. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या जाती असताना ओबीसी (OBC) समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत, ओबीसी समाजात घुसू पाहणाऱ्यांना हा इशारा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
ओबीसींची जनगणना करणे ही प्रमुख मागणी असून, त्यासाठी २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र तक्ता ठेवावा जेणेकरून विस्थापित असलेला समाज नेमका किती आहे, हे कळून आरक्षण देण्याच्या विरोधात नाही, परंतु आमच्या आरक्षणातून वाटा मागत असतील तर ही बाब चुकीची असून, त्यावेळी मात्र आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देखील वडेट्टीवारांनी दिला.
एकमेकाशी लढा, एकमेकांची जिरवा आणि आपण राज्य करा, अशी जी पद्धत होती त्यामुळेच हक्क मिळत नव्हता. आता आम्ही एकमेकांची जिरवणार नाही, तर आमच्या मुळावर येणाऱ्याची जिरवल्याशिवास राहणार नाही, असेही ते म्हणाले.
Read Also :
- … म्हणून शेतकऱ्याने थेट पंतप्रधान मोदींच्या आईलाच लिहिले पत्र
- ‘नागपूरचे ‘चड्डीवाले’ भविष्य ठरवू शकत नाही’, राहुल गांधींचे आरएसएसवर टीकास्त्र
- ‘भाजप कार्यकर्त्यांना चांगलाच धडा शिकवू’, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा इशारा
- ‘राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली’
- गृहमंत्री अनिल देशमुखांनी पोलिसांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा