मुंबई : मुंबई महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी भाजपसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष तयारीला लागले आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने नियोजन करत मतांसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. महापालिका निवडणुकांना अजून वर्ष असले तरी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेकडून गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आता एमआयएमने देखील मुंबई महापालिका निवडणुकीची मैदानात उडी घेतली आहे.
मुंबईतील मुस्लिम आणि बिहारी मते पक्षाकडे खेचण्यासाठी एमआयएमने त्यांच्या बिहारमधील पाच आमदारांना मुंबईत पाचारण केले आहे. मुंबईत मुस्लिम आणि बिहारी मतदारांचे प्रमाण मोठे आहे, या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न एमआयएम करत आहे.
योग्य नियोजन आणि मोर्चेबांधणी करून बिहारप्रमाणेच मुंबईतही यश संपादन करण्यावर एमआयएमचा भर आहे. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने आमची तयारी सुरू असून त्याचा आढावा घेण्यासाठीच आम्ही मुंबईत आलो आहोत, असे एमआयएमचे बिहारचे आमदार अख्तरुल ईमान यांनी सांगितले.
Read Also :
- ‘100 कोटी म्हणजे काही गोळ्या-बिस्कीट नाही, जे यांना देतील’, पडळकरांचा शशिकांत शिंदेंवर निशाणा
- ‘मी पुन्हा येणार’ म्हणण्याची फडणवीसांची सवय ट्रम्पला लागली, अशोक चव्हाणांचा टोला
- आमच्या मुळावर येणाऱ्यांची जिरवल्याशिवाय राहणार नाही, वडेट्टीवारांचा इशारा
- … म्हणून शेतकऱ्याने थेट पंतप्रधान मोदींच्या आईलाच लिहिले पत्र
- ‘नागपूरचे ‘चड्डीवाले’ भविष्य ठरवू शकत नाही’, राहुल गांधींचे आरएसएसवर टीकास्त्र