नागपूर : मुंबई उपनगरामध्ये ऑक्टोबर महिन्यात अचानक काही तासांसाठी वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक सेवांवर परिणाम झाला होता. रेल्वे सेवांपासून ते उद्योगांवर याचा परिणाम पाहण्यास मिळाला होता. मात्र वीज पुरवठा खंडित होणे हा घातपाताचा प्रकार होता की यामागे दुसरे काही कारण होते याची वारंवार चर्चा होते.
आता वीज पुरवठा अचानक खंडित होण्यामागे सायबर हल्ला असण्याच्या शक्यतेविषयी पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. नागपूरमधील एका कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘मध्यंतरी विजेचा ब्रेकडाऊन कशामुळे झाला, हे एकदा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना खासगीत विचारा’ असे वक्तव्य केल्याने पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत.
नागपुरातील पोलीस महासंचालक शिबीर कार्यालयाच्या झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख एकाच मंचावर होते. यावेळी गृहमंत्री देशमुख बोलत होते.
अनिल देशमुख यावेळी म्हणाले की, मध्यंतरी हा ब्रेकडाऊन झाल्यावर आमच्या सायबर तज्ज्ञांकडून विविध स्तरावर चौकशी करण्यात आली. या तपासात अनेक नवीन बाबी कळल्या. त्याची माहिती आम्ही ऊर्जा खात्यालाही दिली. परंतु या बाबत मी बोलणार नाही. हवे असल्यास तुम्ही खासगीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांना विचारा. दरम्यान, गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आता वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे.
Read Also :
- राष्ट्रवादीत पुन्हा घरवापसी ? शिवेंद्रराजेंसह अनेकजण पुन्हा परतण्याचे नवाब मलिकांकडून संकेत
- ‘महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली’, मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रपती पदक विजेत्यांचे अभिनंदन
- महाराष्ट्रातील या 6 व्यक्तींना प्रतिष्ठेचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर
- ‘जे महाराष्ट्रात घडले तेच पश्चिम बंगालमध्ये घडत आहे’, शिवसेनेचा केंद्रावर निशाणा
- मुंबई पालिका निवडणुकीसाठी एमआयएम देखील मैदानात, मोर्चेबांधणीसाठी ‘या’ राज्यातून आमदार येणार