अकोला : जिल्ह्यात प्रथमच नायक चित्रपटात भूमिका साकारलेल्या अनिल कपूर यांची आठवण झाली. मूर्तिजापूर तालुक्यातील जनसंवाद यात्रेत पालकमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या कामाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली. या यात्रेत जवळपास नागरिकांच्या पंचेचाळीस हजार तक्रारी निकाली काढल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमुळे बाधित गावांमधील नागरीकांचे पुनर्वसन व त्यांना नागरी सुविधा पुरविण्यातबाबत बच्चू कडू यांनी जनसवांद यात्रा काढली. या यात्रेत अनेकांच्या तक्रारी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम बच्चू कडू यांनी केले.
खिशाला धनुष्यबाण लावणाऱ्या शिपायांवर देखील हे धाड टाकतील – संजय राऊत
बच्चू कडू म्हणाले की, भूमिअभिलेख कार्यालयात गेले की, कागदपत्रांची यादी दिली जाते. ही सर्व कागदपत्रे आणा. त्याच कार्यालयात अर्धा कागदपत्र मिळतात. मग, ती तिथंच लावून दिल्यास काही फरक पडतो का? मग मी नायक चित्रपट पाहिला. तसंच करू म्हणून त्यांनी हा उपक्रम राबविला. स्टॉल लावल्यानंतर गरजू लोकांनी गर्दी केली. सर्व नागरिकांची कामे झाली. तहसीलदारांनी यासाठी साथ दिली. लोकांनी गोंधळ केल्यास आपण पाहून घेऊ, अशी हिंमत दिली. पहिल्या जनसंवाद यात्रेत पंचेचाळीस हजार तक्रारी निकाली काढल्या. त्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागला, असंही बच्चू कडू म्हणाले.
— Govind Hatwar (@GovindHatwar) February 25, 2022
ते पुढे म्हणाले की, एकाच ठिकाणी तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार आले. त्यांनी या सर्व तक्रारींचा निपटारा केला. कायदा म्हणतो तीन दिवसांत दाखला द्या. पण, कामाच्या बोज्यामुळं ही कामे होत नाहीत. एक-एक माणूस आल्यास वेळ, पैसा आणि श्रम वाया जातो. त्यातही शेतकऱ्यांना अपमान सहन करावा लागतो. लोकांचा अपमान होऊ नये. त्यासाठी लोकप्रतिनिधी असतात.
Read also:
- नवाब मलिक यांची प्रकृती खालावली; ईडी कोठडीतून जे. जे. रुग्णालयात हालवलं
- …असा जावई शोध लावण्याऱ्यांना ‘भैय्या भूषण’ पुरस्कार द्या- राऊतांना मनसेचा टोला
- भाजप बुडाला आग लागल्यापासून…; किशोरी पेडणेकरांचा भाजपला टोला
- नाशकात शिवसेनेने भाजपला लावले सुरुंग! भाजपचे नेते मातोश्रीवर बांधणार शिवबंधन
- ‘डर्टी डझन’ यादी घेऊन किरीट सोमय्या दिल्लीत! पत्रकार परिषद घेऊन आणखी बॉम्ब फोडणार