मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा घेतली. या निवडणुकीत शिवसेनेचे ३९ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहे. एकुण सात टप्प्यात होऊ घातलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची मतमोजणी १० मार्चला होणार आहे. याठिकाणी संजय राऊत यांनी प्रचार सभेत हिंदी भाषिकांचा उल्लेख केल्यावरून त्यांना मनसेने टोला हाणला आहे.
ज्यांना सोडून जायचं आहे, त्यांनी आताच जा नाहीतर..; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना इशारा
संजय राऊत गोरखपूर मधील मतदारसंघात प्रचार सभेत म्हणाले की, आम्ही ज्यावेळी मुंबईत, पुण्यात फिरतो. तेव्हा लाखो हिंदी भाषिक लोक दिसतात. मुंबईततळ म्हणाल तर अर्धी मुंबई हिंदी भाषेत बोलते. त्यातही जिथे आम्ही जातो, तिथे १० पैकी ६ लोक सिद्धार्थनगरचे असतात. हे आमचं नातं आहे उत्तर प्रदेशशी असं ते म्हणाले. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. संजय राऊत यांच्या विधानांवर संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, अर्धी मुंबई हिंदी बोलते, असा जावई शोध लावण्याऱ्यांना ‘भैय्या भूषण’ पुरस्कार द्यायला पाहिजे.
बार्बाडोसमधून भगोड्या चोक्सीला भारतात न आणणारे दाऊदला कधी आणणार ? शिवसेनेची रोखठोक सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून ते अखिलेश यादव, प्रियंका गांधी, अरविंद केजरीवाल असे बडे बडे नेते उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. तसेच या निवडणुकीत यावेळी शिवसेनेचा एकतरी उमेदवार मंत्री होऊन असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Read also:
- भाजप बुडाला आग लागल्यापासून…; किशोरी पेडणेकरांचा भाजपला टोला
- नाशकात शिवसेनेने भाजपला लावले सुरुंग! भाजपचे नेते मातोश्रीवर बांधणार शिवबंधन
- ‘डर्टी डझन’ यादी घेऊन किरीट सोमय्या दिल्लीत! पत्रकार परिषद घेऊन आणखी बॉम्ब फोडणार
- खिशाला धनुष्यबाण लावणाऱ्या शिपायांवर देखील हे धाड टाकतील – संजय राऊत
- किरीट सोमय्यांनी समोर आणली नवीन ‘डर्टी फोर्टीन’ यादी; ‘या’ दोन नेत्यांची नावे आली नव्याने समोर