मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. वारंवार होत असणाऱ्या ईडीच्या हल्ल्यामुळं आता महविकास आघाडी सरकारने पुढचा गेर टाकत भाजपला अडचणीत आण्याचे मनसुबे जाहिररित्या मांडले आहेत.
किरीट सोमय्यांकडून महाविकास आघाडीच्या ‘डर्टी डझन’ मंत्र्यांची लिस्ट जाहीर
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामना मुखपत्रातून भाजपवर जोरदार टीका केली आहे आणि एक सूचक इशाराही देऊन टाकला आहे. नवाब मलिक हे जेव्हा सुटतील तेव्हा भाजपनं एक लक्षात घ्यावं की भाजप आणि त्यांच्या नाझी फौजांसाठी धोकादायक ठरणार आहेत. दाऊद हा भारताचा दुश्मन आहेच त्यात काही वाद नाही. मात्र त्याच दाऊदला पाकिस्तानात संरक्षण देणारे नवाज शरीफ हे देखील भारताचे तितकेच मोठे शत्रू आहेत. इम्रान खानही त्यातलेच आहेत.
उत्तर प्रदेशमधील प्रचारसभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकार जोरदार हल्ला ; म्हणाले…;
पण त्याच भारताच्या शत्रू नवाज शरीफला भेटण्यासाठी आणि मिठी मारण्यासाठी आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास पाकिस्तानला जाऊन आले. हिंमत असेल तर केंद्र सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून दाऊदला खतम करावे अन्यथा फरफटत हिंदुस्थानात घेऊन यावे. पण हे लोक बार्बाडोसमधून भगोड्या मेहुल चोक्सीला भारतात आणू शकले नाहीत. तेथे दाऊदचे काय, अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.भाजपने महाराष्ट्रात लढाई तर सुरु केली आहे मात्र नेहमीप्रमाणे पाठीमागून वर केला आहे.
आता सरकार स्वतः बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागू होईल – आमदार रवी राणा
भाजपच्या लोकांनी मुंबईत तलवारी उपसल्या, पण इतिहासाचे भान ठेवले तर लक्षात येईल की, तलवार चालवणारे शेवटी तलवारीच्या घावानेच मरतात. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अशा तलवारबाजीने पडणार नाही. त्यामुळे भाजपनं आता सावध व्हावं कारण पुढची चाल आता आमची असणार आहे असा सूचक इशारा सामनातून भाजपला देण्यात आला आहे.
Read also:
- ज्यांना सोडून जायचं आहे, त्यांनी आताच जा नाहीतर..; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना इशारा
- नारी के सन्मान मै, शिवसेना मैदान मै; एकनाथ शिंदेंची उत्तर प्रदेशात गर्जना
- शिवसेनेला अजून एक मोठा धक्का! यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाचा छापा
- संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीचा दणका
- मुख्यमंत्री सहा महिन्यांपासुन बेपत्ता, आता मंत्री देखील कुणाला सापडणार नाहीत – चंद्रकांत पाटील