पिंपरी चिंचवड : महापुरूषांचा अवमान केल्याप्रकरणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाई फेकरणाऱ्या तिघांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शाई फेकल्याप्रकरणी मनोज गरबडे यांच्यावर 307 कलम लावून गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या समर्थात अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता. तर पुण्यातील वकिलांनी एकत्र येत मनोज गरबडे यांच्याबाजूने केस लढविली. जामीन मंजुर झाल्यानंतर त्यांच्या समर्थानात आलेल्या सर्व लोकांनासोबत तिघांनाही मोठ्या जल्लोषात आनंदात साजरा केला.
महापुरूषांचा अवमान केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात मनोज गरबडे यांनी चंद्रकांत पाटलांवर शाई फेक केली होती. याप्रकरणी पोलीसांनी मनोज गरबडे, विजय ओव्हाळ, धनंजय इजगज यांना पोलीसांनी अटक केली. व त्यांच्यावर 307 सारखे जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावर राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवत तिघांनाही पोलिसांनी सोडून देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद..! “फडणवीसांनी पहिल्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं कान उपटले पाहिजे”
त्याआधी चंद्रकांत पाटलांवर शाई फेकल्यानंतर सांगलीमध्ये मनोज गरबडे आणि पत्रकाराची हत्तीवरून मिरवणुक काढण्यात येणार आहे. तसेच डेमोक्रेडीट पार्टी ऑफ इंडीयाने मनोज गरबडेला एक लाखाचं बक्षीस देखील देऊन सत्कार देखील करण्यात येण्याची घोषणा केली आहे.
“कितीही काहीही झालं तरी ठाकरे गटासोबतच..!” राजन साळवींना एसीबीची नोटीस, चौकशी होणार
दरम्यान, शाईफेक प्रकरणी ताब्यात असलेले भीमसैनिक मनोज गरबडे व त्यांच्या साथीदारांना पिंपरी न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर झाला आहे. देश संविधानावर चालतो, आपले राज्य छत्रपती शिवाजी महाराज, महापुरूषांनी जो समाज घडवला, क्रांती केली त्या विचारांवर चालतो. असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी आरोपीचं अभिनंदन केलं आहे.
Read also
- “नकळत काही चुकीचं बोललं असेल तर..”; सुषमा अंधारेंनी मागितली हात जोडून माफी
- “त्याची किंमत त्यावेळच्या राज्यकर्त्यांना चुकवावी लागली”; अजित पवारांचा राज्य सरकारवर संताप
- “तुषार भोसले आणि हा कंपू गॅंग म्हणत सुषमा अंधारेंचा जोरदार हल्ला”
- उद्धव साहेब म्हणजे अढळ निष्ठा अन् विश्वासाचं प्रतीक..! राष्ट्रवादीचा माजी आमदार अन् भाजपचे कार्यकर्ते सेनेत दाखल
- “नितेश राणेला सत्तेचा माज चढलाय, त्यांच्यावर कारवाई होईल का?” राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल